Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Municipal Election 2026: राज्यात 14 महापालिकांत भाजप-शिंदे गटाची युती तुटली; मुंबई-ठाण्यात मात्र ‘दोस्ती’ कायम

Municipal Election 2026: राज्यात 14 महापालिकांत भाजप-शिंदे गटाची युती तुटली; मुंबई-ठाण्यात मात्र ‘दोस्ती’ कायम

Municipal Election 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अंतिम दिवस राजकीय भूकंपाने गाजला. राज्यातील १४ प्रमुख महानगरपालिकांमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील युती फिस्कटली असून, हे दोन्ही पक्ष आता एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणार आहेत. दरम्यान, मुंबई आणि ठाण्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागांवर मात्र दोन्ही पक्षांनी मैत्री कायम राखली आहे.

कुठे फिस्कटलं युतीचं गणित?

जागावाटपावरून झालेली ओढाताण आणि स्थानिक नेत्यांमधील मतभेद यामुळे तब्बल १४ महापालिकांमध्ये महायुतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सांगली, अकोला, धुळे, उल्हासनगर, नांदेड, अमरावती, मालेगाव आणि जालना येथे भाजप आणि शिंदे गट स्वतंत्रपणे लढणार आहेत. या शहरांमध्ये आता युतीचे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ‘फ्रेंडली फाईट’ की ‘काटे की टक्कर’ होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा – PMC Election: मोठी बातमी! मारणेनंतर आता अजित पवारांकडून आंदेकर टोळीच्या दोन महिलांना तिकीट

मुंबई-ठाण्यात युती; पण अजित पवार बाहेर?

राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपने एकनाथ शिंदेंशी हातमिळवणी कायम ठेवली आहे. मात्र, येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या युतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यात महायुतीचे समीकरण पूर्णपणे वेगळे असून, अजित पवार गट येथे स्वतंत्र ताकद आजमावणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

निष्ठावंतांची गळचेपी आणि बंडखोरीचा इशारा

दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांत अंतर्गत वादाचा भडका उडाला आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या आयाराम नेत्यांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष आहे. काही नेत्यांनी तर पक्ष कार्यालयाबाहेरच संताप व्यक्त करत अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!