Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mayor Reservation Draw: राज्यातील 29 महापालिकांचे निकाल हाती, पण आता प्रतीक्षा महापौरपदाच्या आरक्षणाची! ‘या’ दिवशी निघणार सोडत

Mayor Reservation Draw: राज्यातील 29 महापालिकांचे निकाल हाती, पण आता प्रतीक्षा महापौरपदाच्या आरक्षणाची! ‘या’ दिवशी निघणार सोडत

Mayor Reservation Draw: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर काल अखेर निकाल स्पष्ट झाले आहेत. मुंबईसह पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली असली, तरी आता सर्वांचे डोळे ‘महापौरपदाच्या आरक्षणाकडे’ लागले आहेत. जोपर्यंत हे आरक्षण निश्चित होत नाही, तोपर्यंत विजयी उमेदवारांपैकी कोणाच्या नशिबात महापौराची खुर्ची आहे, हे स्पष्ट होणार नाही.

पुढील आठवड्यात समजणार आरक्षणाचे गुपित

नगरविकास विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बहुतांश महापालिकांना नवीन महापौर मिळण्याची शक्यता आहे. चक्राकार (Rotation) पद्धतीने अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिला अशा प्रवर्गांनुसार ही सोडत निघेल. मागील वेळेस जे आरक्षण होते, ते वगळून इतर गटांना यंदा संधी दिली जाणार आहे.

हेही वाचा – Pune Election Result: पुणे महापालिकेत भाजपच्या महिला उमेदवारांचा डंका; 92 पैकी ‘इतक्या’ महिला उमेदवारांनी मारली बाजी

मुंबईत भाजपचे वर्चस्व; ऐतिहासिक निकालाची नोंद

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या २२७ जागांच्या निकालात महायुतीने ११८ जागांसह बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप ८९ जागांसह अव्वल स्थानी आहे, त्यामुळे मुंबईचा महापौर भाजपचाच होणार, हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागा मिळाल्या आहेत, तर शिंदे गटाने २९ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या पदरात २४ जागा पडल्या आहेत.

नगरसेवकांमध्ये धाकधूक

निवडून आलेले अनेक दिग्गज नगरसेवक सध्या महापौरपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, आरक्षण कोणत्या गटासाठी सुटते, यावरच त्यांची स्वप्ने अवलंबून आहेत. जर एखादा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी राखीव झाला, तर चुरस अधिक वाढणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!