Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vikas Gogawale : मोठी बातमी! महिनाभरापासून फरार असलेला मंत्र्याचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांना शरण

Vikas Gogawale :  मोठी बातमी! महिनाभरापासून फरार असलेला मंत्र्याचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांना शरण

Vikas Gogawale: नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता असलेले शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर आज पोलिसांना शरण आले. न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वीच त्यांनी महाड पोलीस ठाण्यात हजेरी लावली.

गुप्तता पाळत पोलीस ठाण्यात प्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारे विकास गोगावले आज सकाळी अत्यंत गोपनीय पद्धतीने महाड पोलीस ठाण्यात दाखल झाले. कोणालाही सुगावा लागू नये यासाठी त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मागच्या दाराने पोलीस ठाण्यात प्रवेश केला आणि शरणागती पत्करली. सध्या त्यांची पोलीस चौकशी सुरू असून, पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

डिसेंबर २०२५ मध्ये महाड नगरपालिकेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे आणि विकास गोगावले यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या संघर्षात वाहनांची तोडफोड आणि परस्पर विरोधी हल्ले झाले होते. याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यापासून २ डिसेंबरपासून विकास गोगावले फरार होते.

उच्च न्यायालयाचे ताशेरे आणि पोलिसांची कारवाई

विकास गोगावले सापडत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. “मंत्र्यांची मुले का सापडत नाहीत?” असा रोखठोक सवाल करत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना आज सकाळी ११ वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले होते.

आज जामीन अर्जावर सुनावणी

विकास गोगावले यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. न्यायालय त्यांना दिलासा देऊन जामीन मंजूर करणार? की त्यांची रवानगी पोलीस कोठडीत होणार? याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. थोड्याच वेळात पोलीस त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!