Today शनिवार, 1st ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raj Thackeray : ‘गरज पडली तर लवचिक भूमिका…’; शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंचे मोठे विधान

Raj Thackeray :  ‘गरज पडली तर लवचिक भूमिका…’; शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंचे मोठे विधान

Raj Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होत असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. अत्यंत बदललेल्या आजच्या राजकारणात ‘लवचिक भूमिका’ घेण्याचे संकेत देत राज ठाकरेंनी आगामी काळातील नव्या रणनीतीचे संकेत दिले आहेत.

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करताना राज ठाकरे म्हणाले की, “बाळासाहेब १०० वर्षांनीच काय, तर त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षातही लोकांच्या स्मरणात राहतील. सत्ता येते आणि जाते, पण पिढ्यानपिढ्या प्रभाव टाकू शकतील असे व्यक्तिमत्त्व दुर्मिळ असते.” आजच्या राजकारणात निष्ठा आणि तत्त्वे सहज विकली जात असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

हेही वाचा – BMC Election 2026: ‘सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी…’, मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

‘लवचिक’ भूमिकेचा शब्द: अर्थ काय?

राज ठाकरे यांच्या पोस्टमधील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे त्यांनी ‘लवचिकते’ बाबत केलेले विधान. त्यांनी म्हटले आहे की, “आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल.” बाळासाहेबांनीही अनेकदा प्रसंगानुरूप लवचिक पवित्रा घेतला होता, परंतु त्यांचे मराठी माणसावरील प्रेम कधीही कमी झाले नाही, असा दाखला देत राज यांनी आपल्या संभाव्य राजकीय बदलांचे समर्थन केले आहे.

मराठी अस्मितेचा लढा धगधगत ठेवणार

आजचे राजकारण केवळ निवडणुकीतील क्लुप्त्या आणि यशावर मोजले जात असले, तरी आपण मराठी भाषा आणि मराठी माणसासाठीचा लढा नेटाने पुढे नेऊ, असा शब्द त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिला आहे. “बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची आमची श्रद्धा कधीही तसूभरही कमी होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय तर्कवितर्क

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि बदललेल्या राजकीय समीकरणांच्या काळात राज ठाकरेंचे हे ‘लवचिक भूमिकेचे’ विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे आगामी काळात मनसे एखाद्या मोठ्या युतीचा भाग होणार का, किंवा आपली कार्यपद्धती बदलणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!