Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत 22 जुलैला सर्वोच्च सुनावणी; विधेयक मंजुरीच्या कालमर्यादेवर मुर्मू यांच्याकडून प्रश्न

राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत 22 जुलैला सर्वोच्च सुनावणी; विधेयक मंजुरीच्या कालमर्यादेवर मुर्मू यांच्याकडून प्रश्न

नवी दिल्ली: राज्यांच्या विधिमंडळांनी राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा घालून देऊ शकतात काय, या राष्ट्रपतींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ येत्या २२ जुलै रोजी सुनावणी करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या कॉज लिस्टनुसार २२ जुलै रोजी हे प्रकरण सुनावणीसाठी घेतले जाईल. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यासह न्या. सूर्यकांत, न्या. विक्रम नाथ, न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. अतूल चांदूरकर यांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होईल. गेल्या मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनुच्छेद १४३ (१) नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करून १४ प्रमुख मुद्द्यांसह हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवले होते.

सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयाबाबत त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालयाने या निकालात म्हटले होते की, राज्यांच्या विधिमंडळांनी जी विधेयके मंजूर करून राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी त्यांच्याकडे पाठवली आहेत, त्यावर राष्ट्रपतींनी तीन महिन्यांत निर्णय घेतला पाहिजे. तामिळनाडू सरकारने राज्यपालांकडे पाठवलेल्या विधेयकाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने हा निर्णय दिला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!