Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पाकमधील ‘द रेजिस्टेंस फ्रंट ‘नेच केला पहलगाम हल्ला; भारताच्या आरोपांना संयुक्त राष्ट्राचाही दुजोरा

पाकमधील ‘द रेजिस्टेंस फ्रंट ‘नेच केला पहलगाम हल्ला; भारताच्या आरोपांना संयुक्त राष्ट्राचाही दुजोरा

नवी दिल्ली: पाकिस्तान पुरस्कृत कुख्यात प्रतिबंधित ‘लष्कर -ए-तोयबा’चा छुपा समूह ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ने (टीआरएफ) जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे हल्ला घडवला, असा ठपका संयुक्त राष्ट्रातील एका अहवालात ठेवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात टीआरएफचा उल्लेख झाल्याने पाकिस्तानचा खोटारडेपणा व बनावट चेहरा पुन्हा एकदा जगजाहीर झाला. तसेच भारताची कूटनीती यशस्वी होण्यासह भारताच्या आरोपांना दुजोरा मिळाला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) पहिल्यांदाच आपल्या अहवालात पहलगाम हल्ल्यात लष्कर -ए-तोयबाची उप शाखा असलेल्या ‘टीआरएफ’चा हात असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे पाक पुरस्कृत सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताची स्थिती भक्कम होण्याची अपेक्षा आहे. जम्मू-काश्मिरात २२ एप्रिल रोजीचा हल्ला हा लष्कर -ए-तोयबाच्या पाठिंब्याशिवाय होणे शक्यच नाही. कारण टीआरएफ व लश्कर यांच्यात लागेबांधे आहेत, असे सुरक्षा परिषदेच्या निगरानी दलाने आपल्या अहवालात एका सदस्य देशाच्या हवाल्याने म्हटले आहे.

परंतु या अहवालात त्या सदस्य देशाच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या प्रकरणाची माहिती असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या संसदेत पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिलेल्या निवेदनात टीआरएफचा उल्लेख हटवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले. पहलगाम हल्ला ५ अतिरेक्यांनी घडवला आहे. टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली व त्याच दिवशी घटनास्थळाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. या हल्ल्यानंतर प्रादेशिक स्थिती अजूनही नाजूक झालेली आहे. दहशतवादी संघटना या प्रादेशिक तणावाचा फायदा उचलू शकतात, अशी भीतीसुद्धा प्रस्तुत अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तान दहशतवादी हल्ल्यांमागे स्वतःचा हात असल्याचे आरोप फेटाळत आहे. पाकची ही रणनीती आता अपयशी ठरली. कारण ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ आणि ‘पीपल्स अगेंस्ट फासिस्ट फ्रंट ‘सारख्या धर्मनिरपेक्ष वाटणाऱ्या व आधुनिक नावांचा वापर पाकमध्ये सुरूच आहे. लष्कर -ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या जिहादी संघटनांवरून लक्ष विचलित करणे व जम्मू-काश्मिरात आपल्या दहशतवादी अभियानाला पाकिस्तान स्वदेशी रूप देऊ इच्छित आहे, असेही सुरक्षा परिषदेच्या अहवालात ठळकपणे नमूद आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!