Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramiti Elections: 2029 मध्ये बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्षाची ठिणगी? रोहित पवारांचे सूचक विधान

Baramiti Elections: 2029 मध्ये बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्षाची ठिणगी? रोहित पवारांचे सूचक विधान

Baramiti Elections: बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, आता राजकीय वर्तुळात २०२९ च्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य संघर्षाची चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेला निमित्त ठरले ते अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी भविष्यातील उमेदवारीबाबत व्यक्त केलेली इच्छा. जय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “२०२९ मध्ये मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे, मात्र सध्या मला कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडेल.” त्यांच्या या विधानाने राजकीय चर्चांना तोंड फोडले असून, आमदार रोहित पवार यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

राजकारणात कार्यकर्त्यांची इच्छा सर्वोच्च: रोहित पवारांचे सूचक भाष्य
जय पवारांच्या विधानाचा धागा पकडत रोहित पवारांनी अत्यंत चपखल शब्दांत टोला लगावला आहे. रोहित पवार म्हणाले की, “राजकारणात कार्यकर्त्यांची आणि पक्षाची इच्छा कधीही डावलता येत नाही. जर २०२९ मध्ये सुनेत्रा काकी रिंगणात नसतील, तर त्यांच्या पक्षाकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्यांच्याशी आमची थेट लढत होईल.” रोहित पवारांच्या या विधानामुळे आगामी काळात बारामतीमधील राजकीय संघर्ष केवळ कौटुंबिक मर्यादेत न राहता तो ‘सर्वपक्षीय’ आणि ‘विचारधारेची लढाई’ म्हणून पाहिला जाईल, हे स्पष्ट झाले आहे.

पवार विरुद्ध पवार: नात्यापेक्षा राजकारण वरचढ?
बारामतीतील संघर्षावर भाष्य करताना रोहित पवारांनी काही महत्त्वाचे आणि गंभीर मुद्दे मांडले आहेत, जे भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट करतात. लोकसभेला आणि विधानसभेला ज्याप्रमाणे ‘पवार विरुद्ध पवार’ असे चित्र संपूर्ण राज्याने पाहिले, तशीच स्थिती २०२९ मध्येही उद्भवू शकते. जय पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार असा सामना झाल्यास नवल वाटायला नको, असे संकेत रोहित पवारांनी दिले आहेत.

कुटुंब विरुद्ध विचारधारा:
कुटुंब पुन्हा एकत्र यावे ही अजितदादांची शेवटची इच्छा असल्याचे बोलले जात असले तरी, राजकीय प्रगतीसाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. सत्तेत असलेल्यांना आणि विरोधात असलेल्यांना तांत्रिकदृष्ट्या एकत्र येणे आता सोपे राहिलेले नाही. पवारांचे राजकीय वलय संपवण्यासाठी काही बाह्य शक्ती जाणीवपूर्वक ‘पवार विरुद्ध पवार’ असा वाद लावून देत असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला आहे. ही लोकांची इच्छा नसली तरी काही राजकारणी पडद्यामागून यासाठी हालचाली करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बारामतीचा सत्तासंघर्ष अधिक तीव्र होणार
थोडक्यात सांगायचे तर, बारामतीत भविष्यात जय पवार आणि युगेंद्र पवार आमनेसामने ठाकण्याची शक्यता आता रोहित पवारांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. पवारांच्या पुढच्या पिढीमध्येही हा राजकीय संघर्ष असाच सुरू राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बारामतीतील सत्तासंघर्ष नजीकच्या काळात शमण्याऐजी अधिक तीव्र आणि टोकदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!