Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अजित पवार वर्षा बंगल्यावर! पार्थ पवार जमीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांशी महत्त्वाची भेट

अजित पवार वर्षा बंगल्यावर! पार्थ पवार जमीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांशी महत्त्वाची भेट

Ajit Pawar Meet Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक साधारण नसून, ती त्यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावावर असलेल्या कथित जमीन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीवर कोट्यवधींच्या जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, अंजली दमानिया, अंबादास दानवे, आणि एकनाथ खडसे यांच्यासह विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांनी फडणवीसांची भेट घेणे हे राज्याच्या राजकीय समीकरणात नवा ट्विस्ट आणणारे ठरू शकते.

भेटीमागचं नेमकं कारण काय?

अजित पवार यांनी गुरुवारी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सार्वजनिकरित्या केली होती. त्यांनी स्पष्ट केलं होतं की, या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही. सर्व तपास झाला पाहिजे. तथापि, विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे की, पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांच्या माहितीशिवाय ३ कोटींच्या व्यवहाराचा स्टॅम्प ड्युटी फक्त ५०० रुपये कशी भरली गेली? या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट केवळ औपचारिक नसून, पुढील राजकीय घडामोडींचा संकेत मानला जात आहे.

हेही वाचा –पार्थ पवार जमीन प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही’

नेमकं प्रकरण काय आहे?

शिवसेना (ठाकरे गट) चे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की, १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार पार्थ पवार यांच्या कंपनीने फक्त ३०० कोटींमध्ये केला. त्यातही, कंपनीचं भांडवल केवळ एक लाख रुपये असूनसुद्धा कोरेगाव पार्क परिसरात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुरू होती. आश्चर्य म्हणजे, उद्योग संचालनालयाने फक्त ४८ तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली, आणि २७ दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाला, असा आरोपही दानवेंनी केला.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, विरोधक अजित पवारांना लक्ष्य करत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी, आगामी काही दिवसांत या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!