Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद कायम राहणार? अजित पवार-मुंडेंमध्ये तासभर खलबते; दोषी आढळले तरच कारवाईचे संकेत

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद कायम राहणार? अजित पवार-मुंडेंमध्ये तासभर खलबते; दोषी आढळले तरच कारवाईचे संकेत

मुंबई: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदास तूर्तास कोणताही धोका नसल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांचे म्हणणे आहे. देशमुख हत्येप्रकरणी मंत्री मुंडे यांच्याविरोधात जोपर्यंत पुरावे आढळत नाहीत, सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीचे अहवाल येत नाहीत आणि त्यात मुंडेंना दोषी ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. जर यात दोषी आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंडे यांना तूर्तास तरी अभय मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

बीडमधील देशमुख हत्येप्रकरणी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. देशमुख यांच्या हत्येसाठी मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीडमधील खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांच्यासह सत्ताधारी भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, विरोधकांकडून हा विषय लावून धरण्याचे संकेत मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना बोलावून घेऊन मागील काही दिवसांपासूनचा घटनाक्रम समजून घेतला. मुंडे यांनी अजित पवारांकडे आपली भूमिका मांडल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड याच्याशी माझे पहिल्यापासूनच संबंध आहेत, पण त्याचाही थेट देशमुख हत्येशी काही संबंध नाही.

विरोधक मला व आपल्या पक्षाला बदनाम करण्यासाठी या गोष्टीचा फायदा घेऊ इच्छित आहेत. यात सत्ताधारी आमदारांचेही काही हितसंबंध आहेत. त्यामुळे माझे राजकीय करिअर संपवण्यासाठी माझ्याविरोधात् सत्तेतील काही लोकांसह विरोधकांनी षडयंत्र रचले आहे, अशी भूमिका मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे मांडल्याचे सांगण्यात आले. यावर अजित पवार यांनीही विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडण्याचे कारण नाही. जोपर्यंत तपास यंत्रणा या प्रकरणात कोणाला दोषी धरत नाहीत तोपर्यंत मुंडे यांचा राजीनामा घेण्याचे कोणतेही कारण नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

सुरेश धस-फडणवीस यांच्यात सविस्तर चर्चा

अजित पवार आणि धनंजय मुंडे याची सोमवारी सायंकाळी तासभर मंत्रालयात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण लावून धरणारे सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांना सह्याद्रीवर बोलवून चर्चा केली. यादरम्यान, फडणवीस यानी धस यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते. देशमुख हत्या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास केला जाईल. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव असण्याचा प्रश्नच राहणार नाही. आता या प्रकरणात विरोधकांनी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यापासून दूर राहावे तसेच माध्यमे व सार्वजनिक ठिकाणी बोलताना संयम बाळगावा, अशा सूचना केल्याचे समजते.

अजित पवार-फडणवीस यांच्यात चर्चा

देशमुख हत्या प्रकरण विरोधकांनी लावून धरल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध झाले असून, त्यांनी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात होत आहे. यावेळी सर्व मंत्री बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. यावेळी सध्या देशमुख हत्येप्रकरणी माध्यमात आणि राज्यात जे काही सुरू आहे त्याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारची म्हणून जी काही भूमिका असेल ती फडणवीस किवा अजित पवार मांडू शकतात.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!