Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election: मुंबई महापालिका आरक्षण सोडतीचा काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार आरक्षण सोडत

BMC Election: मुंबई महापालिका आरक्षण सोडतीचा काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार आरक्षण सोडत

BMC Election: मुंबईकरांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर केले असून, ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीवर २० नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवता येतील, आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण यादी राजपत्रात प्रसिद्ध होईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

आरक्षण सोडतीचं वेळापत्रक

  • ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर: आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाकडे प्रस्ताव सादर
  • ६ नोव्हेंबर: सोडतीची अधिकृत अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध
  • ११ नोव्हेंबर: आरक्षण सोडत काढली जाईल
  • १४ नोव्हेंबर: प्रारूप आरक्षण व हरकतींसाठी सूचना प्रसिद्ध
  • २० नोव्हेंबर: हरकती आणि सूचना सादर करण्याची शेवटची तारीख
  • २१ ते २७ नोव्हेंबर: हरकतींचा विचार आणि निर्णय प्रक्रिया
  • २८ नोव्हेंबर: अंतिम आरक्षण राजपत्रात प्रकाशित

प्रभाग रचनेला मंजुरीनंतर पुढचं मोठं पाऊल

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांची रचना राज्य निवडणूक आयोगाने आधीच मंजूर केली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. राजकीय पक्षांचे नेते, माजी नगरसेवक आणि संभाव्य उमेदवार कोणत्या प्रभागात आरक्षण लागू होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

राजकीय समीकरणांमध्ये बदलाची शक्यता

२२७ प्रभागांपैकी १७ प्रभाग हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. तर उर्वरित २१० प्रभागांमध्ये ओबीसी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. यामुळे मुंबईतील राजकीय संतुलन आणि निवडणूक गणितात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपला, आणि त्यानंतरपासून पालिकेवर प्रशासकाची सत्ता आहे. निवडणुका कधी होणार याबाबत चर्चा सुरू असतानाच आरक्षण सोडतीच्या या घोषणेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!