Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Municipal Elections: ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणाबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘आजच राज ठाकरेंची भेट घेणार’

Municipal Elections: ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणाबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘आजच राज ठाकरेंची भेट घेणार’

Municipal Elections: राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान करत संभाव्य एकत्रित लढतीचे संकेत दिले आहेत. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तसेच, आज आपण स्वतः राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर मराठी अस्मितेच्या रक्षणासाठीची निर्णायक लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो वा कोणत्याही परिस्थितीत असो, त्याने मुंबई वाचवण्यासाठी या संघर्षात सहभागी व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईत अलीकडेच ‘मुंबई वाचवा’ या आशयाचे पोस्टर्स झळकल्यानंतर सरकारने ते हटवण्याचे आदेश दिल्याचा आरोप करत राऊत यांनी आचारसंहितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठी माणसासाठी नियम कडक आणि सत्ताधाऱ्यांसाठी सवलत का, असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधारी पक्षांच्या खर्चावरही संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. निवडणूक जाहीर होण्याच्या अगदी आधीपर्यंत शासकीय निधीचे आदेश, विकासाच्या घोषणा सुरू होत्या, मग हा आचारसंहितेचा भंग नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, १५ लाखांच्या खर्च मर्यादेचे सत्ताधारी पक्ष खरोखर पालन करतील का, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कोट्यवधींचा खर्च आणि नगरसेवक फोडण्यासाठी मोठ्या रकमांचा वापर झाल्याचे आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाने यावर कोणती ठोस यंत्रणा राबवणार, असा सवाल केला.

हेही वाचा –Sanjay Raut : सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे; राहुल गांधींमुळे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता, संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘पैशांचा खेळ होऊ द्या, मागून वार करा, पण आम्ही आमची लढाई सोडणार नाही. मुंबई वेगळी करण्याचा आणि ती उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव काही शक्ती खेळत आहेत. अशा वेळी मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन मुंबईसाठी लढले, अशी नोंद इतिहासात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी?

युतीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, औपचारिक घोषणा अद्याप झालेली नसली, तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीतील पक्षांना युतीसाठी दिल्लीची पायरी चढावी लागते, मात्र ठाकरे बंधू स्वबळावर आणि स्वाभिमानाने एकत्र आले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. इतर महापालिकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही लढाई २९ महापालिकांपेक्षा मुंबईच्या अस्तित्वाची आहे, असे सांगत राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ दिला.

हेही वाचा – Pune Land Scam: पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर संजय राऊतांचं मोठं भाष्य; अजित पवारांवर थेट प्रहार, म्हणाले…

मुंबई कोणाच्या घशात घालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येत्या आठवड्यात युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते, असे संकेत देत संजय राऊत यांनी काँग्रेसवरही अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईच्या लढाईत काँग्रेसने आमच्यासोबत ठामपणे उभे राहायला हवे होते, अशी भूमिका मांडत त्यांनी स्थानिक नेत्यांना भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊ नये, असा इशारा दिला. दरम्यान, आज होणारी राज ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या भेटीत नेमकी कोणती दिशा ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!