Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले! खासदारांची २०, तर आमदारांची २५ फेब्रुवारीला बैठक

गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले! खासदारांची २०, तर आमदारांची २५ फेब्रुवारीला बैठक

मुंबई : शिवसेनेला (ठाकरे) लागलेली गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून त्यांनी पक्षाच्या खासदारांची २०, तर आमदारांची २५ फेब्रुवारीला बैठक बोलावली आहे. पक्षातील कमकुवत बाबींवर आणि विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गटनेते पदाबाबत तेव्हा चर्चा केली जाणार असल्याचे समजते.

शिवसैनिक पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने ठाकरे यांचे टेंशन वाढले आहे. खासदारदेखील सेनेची साथ सोडणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकतेच लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेला (ठाकरे) जय महाराष्ट्र करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. साळवी यांच्यापाठोपाठ माजी आमदार सुभाष बने यांच्यासह अनेक नेत्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात ठाकरेंना मोठा हादरा बसला

शिवसेनेची रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील माजी नगरसेविका राजूल पटेल यांनीही पक्षत्याग केला. शिवसेनेला (ठाकरे) खालसा करण्यासाठी शिंदे यांच्या पुढाकाराने ‘मिशन टायगर’ राबवले जात आहे. माजी आमदार वैभव नाईकही लवकरच प्रवेश करतील, असा दावा शिंदेंच्या सेनेकडून केला जात आहे. कोकणातील शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांना देखील गळाला लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.

आजवर निष्ठावंत राहिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून पक्ष सोडण्याचे प्रकार वाढीस लागल्याने ठाकरे यांनी खासदार, आमदारांची बैठक बोलावली आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आणि पक्षात नेमके काय सुरू आहे, खासदार आमदारांच्या मनात नेमके काय आहे, हे जाणून घेण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जाते. ‘मातोश्री’वर हल्ली रोज बैठका होतात. प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातो. ठाकरे त्यावेळी उपस्थित असतात, असे शिवसेनेचे (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!