Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bihar Election 2025: बिहार निवडणुकीचे बिगुल आज दुपारी 4 वाजता वाजणार

Bihar Election 2025: बिहार निवडणुकीचे बिगुल आज दुपारी 4 वाजता वाजणार

Bihar Election 2025: भारतीय निवडणूक आयोग (ECI) आज, 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता, पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. दोन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर आयोगाने ही घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी आयोगाने राजकीय पक्ष आणि अंमलबजावणी संस्थांशी सविस्तर चर्चा केली आहे. सध्याच्या 243 सदस्यीय बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने, आयोग आज निवडणुकीच्या तारखा निश्चित करणार आहे.

आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन (RJD-काँग्रेस-डावे पक्ष) यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2020 साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत पार पडल्या होत्या. त्या वेळी NDA आघाडीने विजय मिळवून नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. मात्र, ऑगस्ट 2022 मध्ये जद(यू) ने एनडीएला सोडून आरजेडीच्या महागठबंधनात प्रवेश केला, आणि नंतर जानेवारी 2024 मध्ये पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करून सत्तेत परतले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजात मोठे फेरबदल; निवडणूक विभाग कोणाकडे?

छठ सणानंतरच निवडणुकीची मागणी

निवडणूक आयोगाने अलीकडेच भाजप, काँग्रेस, जद(यू), आरजेडी, आप, बसपा, सीपीआय(एम) यांसह अनेक पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. या बैठकीत बहुतेक पक्षांनी छठ सणानंतर लगेचच मतदानाचे वेळापत्रक ठेवावे, अशी मागणी केली. कारण या काळात बाहेरगावी असलेले लाखो मजूर बिहारमध्ये परततात, ज्यामुळे मतदारसंख्येचा सहभाग वाढू शकतो.

हेही वाचा – BMC Election: राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी

निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, बिहारमध्ये 22 वर्षांनंतर मतदार यादी तयार करण्यात आली आहे. यासोबतच अनेक नवीन उपक्रम आणि तांत्रिक सुधारणा आगामी निवडणुकीत अमलात आणल्या जाणार आहेत. सध्या बिहार विधानसभा निवडणुकीत 38 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी, तर 2 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवले गेले आहेत. आता सर्वांचे लक्ष आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे, जिथे बिहारच्या राजकीय रणधुमाळीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!