Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आशिया चषक यूएईमध्ये? बीसीसीआय आयोजनासाठी सरसावले; भारत-पाकिस्तान लढतीची शक्यता

आशिया चषक यूएईमध्ये? बीसीसीआय आयोजनासाठी सरसावले; भारत-पाकिस्तान लढतीची शक्यता

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आगामी आशिया चषक (टी-२०) स्पर्धा आयोजित करण्यास सज्ज आहे. याबाबत काही दिवसांत औपचारिक घोषणा होण्याची अपेक्षा आहे, असे आशियाई क्रिकेट परिषदेकडून (एसीसी) स्पष्ट करण्यात आले.

बीसीसीआयने याअगोदरच ऑगस्ट महिन्यातील बांगलादेशचा दौरा खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता रद्द केला आहे. त्यानंतर एसीसी बैठकीच्या ढाका येथील आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, बांगलादेशमधील अस्थिरराजकीय परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आपला प्रतिनिधी पाठवण्यास नकार दर्शवला होता. भारतासोबत श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि इतर क्रिकेट मंडळही ढाकामधील बैठकीसाठी प्रत्यक्ष सहभागासाठी उत्सुक नव्हते, आशिया चषकाच्या आयोजन स्थळावर एसीसीच्या सर्व २५ सदस्य देशांची ढाकामध्ये गुरुवारी ऑनलाईन बैठक झाली.

बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्हर्चुअल पद्धतीने बैठकीत सहभाग घेतला. बीसीसीआय यूएईमध्ये आशिया कप आयोजित करेल, भारताचे सर्व सामने दुबईमध्ये आयोजित करण्याची शक्यता आहे. वेळापत्रकावर अजूनही चर्चा सुरू आहे, असे एसीसीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा दोन आठवड्यांपेक्षा थोडी जास्त काळ चालेल. भारत या काळात वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, आशिया चषकामुळे या मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागेल. बीसीसीआयच्या दबावामुळे अजेंड्यावरील १० पैकी फक्त दोन बाबीवर चर्चा झाली.

२५ सदस्य प्रत्यक्ष, आभासी पद्धतीने बैठकीला हजर

ढाका येथे एसीसी अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्ची यांनाही भारत-पाक सामन्याबद्दल विचारले असता त्यांनी मौन बाळगले. नक्वी यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही लवकरच याबाबतची घोषणा करू, बीसीसीआयशी चर्चा केली आहे आणि काही मुद्दे आहेत जे आम्ही लवकरच सोडवू. सर्व २५ सदस्य बैठकीला प्रत्यक्ष किवा आभासी पद्धतीने उपस्थित होते. आम्हा सर्वांचे एकमत आहे.

बीसीसीआय त्रयस्थ ठिकाणी स्पर्धा खेळवण्याच्या बाजूने

नियोजित वेळापत्रकानुसार २०२५ आशिया चषकाचे यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानने भारतामध्ये खेळण्यास नकार दर्शवला आहे. त्यावर तोडगा म्हणून यूएईत स्पर्धा खेळवण्याचा पर्याय खुला होता आणि बीसीसीआय ही त्रयस्थ ठिकाणी स्पर्धा खेळवण्याच्या बाजूने आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!