Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईत राडा! ताज लँड्स हॉटेलबाहेर शिवसेना ठाकरे गट आणि भाजप समर्थकांमध्ये खडाजंगी

मुंबईत राडा! ताज लँड्स हॉटेलबाहेर शिवसेना ठाकरे गट आणि भाजप समर्थकांमध्ये खडाजंगी

Anil Parab Mumbai Rada: मुंबईतील ताज लँड्स हॉटेल परिसरात शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप समर्थित संघटनांमध्ये मोठा राडा झाला. भारतीय कामगार सेनेचे सदस्य भाजपप्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघात ओढले जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला. याच कारणावरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की व ओरडाओरडा सुरू झाला. घटनास्थळी पोहोचताच शिवसेना नेते अनिल परब यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव केल्याने परब संतापले. माझ्या कार्यकर्त्यांना मी कधीही अडवणार नाही, असे त्यांनी पोलिसांना सुनावले.

तथापी, चर्चेला फक्त काहीजणांना परवानगी देण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवरही परब यांनी नाराजी व्यक्त केली. ‘सत्तेचा माज दाखवू नका, माझ्यासोबत किमान 25 कार्यकर्ते येणारच,’ असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेनेचा आरोप आहे की भारतीय कामगार सेनेतील कामगारांना चुकीच्या पद्धतीने भाजपच्या कर्मचारी संघात सामील केले जात आहे. सह्या घेताना फसवणूक झाल्याचा आरोपही परबांनी केला.

हेही वाचा – बिहारमध्ये NDA चा प्रचंड विजय! फडणवीसांनी केलेल्या प्रचाराने केली कमाल

या सर्व घडामोडींनंतर शिवसैनिकांनी हॉटेलबाहेर घोषणा देत निषेध व्यक्त केला. भाजपप्रणीत कर्मचारी संघटना आणि शिवसेनेच्या कामगार संघटनेमधील संघर्षामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!