Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजगुरुनगरमध्ये अनोखी निवडणूक! गावकऱ्यांनी लिलावातून ठरवला उमेदवार

राजगुरुनगरमध्ये अनोखी निवडणूक! गावकऱ्यांनी लिलावातून ठरवला उमेदवार

Rajgurunagar Election: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या एका प्रभागातील गावकऱ्यांनी निवडणुकीसाठी अनोखा प्रयोग केला आहे. पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि मतांचे विभाजन रोखण्यासाठी संपूर्ण प्रभाग बिनविरोध ठेवण्याचे ठरवले, परंतु उमेदवारांची निवड लिलावाच्या माध्यमातून करण्याचा नियम त्यांनी ठरवला. १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा प्रयोग यशस्वी झाला.

प्रभागात सर्वसाधारण आणि महिला राखीव अशा दोन जागा होत्या. इच्छुक उमेदवारांनी गावाच्या मंदिरात हजेरी लावली, आणि गावकऱ्यांनी ठरवले की जो सर्वाधिक बोली लावेल त्यालाच सर्वांचा पाठिंबा मिळेल. बाकी सर्वांनी आपले अर्ज मागे घ्यावेत, असे सर्वांनी मान्य केले.

हेही वाचा – लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण! दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र; भाजपची डोकेदुखी वाढली

सर्वसाधारण जागेसाठी बोली अवघ्या काही मिनिटांत ९० लाखांवर पोहोचली, आणि शेवटच्या टप्प्यात ती १ कोटी ३ लाख रुपये झाली. महिला राखीव जागेसाठीही बोली २२ लाख रुपयांवर स्थिरावली. दोन्ही विजेत्या उमेदवारांना गावकऱ्यांनी एकमताने पाठिंबा दिला, आणि इतर सर्व इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतले. परिणामी, हा प्रभाग संपूर्णपणे बिनविरोध राहिला. सध्या गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाची राज्यभरात चर्चा होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!