Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात चोरट्यांचा नवा कारनामा! रस्त्यावरील 12 लाखाचे पथदिवे केले लंपास

पुण्यात चोरट्यांचा नवा कारनामा! रस्त्यावरील 12 लाखाचे पथदिवे केले लंपास

Street Lights Stolen In Pune: पुणे शहरात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरातील सार्वजनिक पथदिवे चोरट्यांनी लंपास केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुष्पमंगल कार्यालय ते संत एकनाथनगर या मार्गावर बसवण्यात आलेले पथदिवे आणि त्यांचे खांब काही अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याचा प्रकार 1 नोव्हेंबर 2025 रोजी घडला.

महापालिकेच्या बिबवेवाडी विभागाने या मार्गावर रहदारी सुरक्षित ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंना आधुनिक पथदिवे बसवले होते. मात्र, रात्रीची वेळ साधून चोरट्यांनी संपूर्ण साहित्य उखडून नेले. चोरी गेलेल्या खांब आणि दिव्यांची एकूण किंमत तब्बल 12 लाख रुपयांच्या घरात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अचानक प्रकाशव्यवस्था गायब झाल्याने रस्ता पूर्ण अंधारात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेवरही गंभीर परिणाम झाला आहे.

हेही वाचा –पुणे महापालिकेला 2 कोटी 81 लाखांचा भुर्दंड; भाजप नेत्याच्या धमकीमुळे प्रकल्प पडला बंद

घटनेची माहिती मिळताच विभागीय अभियंत्याने बिबवेवाडी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, सार्वजनिक मालमत्तेची इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली चोरी पाहता हा प्रकार एखाद्या संघटित टोळीचे काम असल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे. चोरट्यांनी पळवून नेलेले साहित्य शोधून काढणे आणि आरोपींना बेड्या ठोकणे हे सध्या पोलिसांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!