Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dharmendra Death: धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींसह अमित शहांनी व्यक्त केला शोक

Dharmendra Death: धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींसह अमित शहांनी व्यक्त केला शोक

Dharmendra Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि सर्वांच्या मनातील ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांनी काल वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते आणि प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडसह संपूर्ण देशात मोठी शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “धर्मेंद्रजींचे निधन हे भारतीय चित्रपटविश्वासाठी अपूरणीय नुकसान आहे. अनेक दशकांच्या प्रवासात त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडणारी संस्मरणीय कामगिरी केली. त्यांचा कार्यकाळ आणि त्यांची ओळख पुढील पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या कुटुंबियांसह चाहत्यांप्रती माझ्या मन:पूर्वक संवेदना.”

हेही वाचा –Dharmendra Passes Away: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एक सुवर्णकाळ संपला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी X वर अभिनेत्याप्रती आपली दुःखद भावना व्यक्त केली. त्यांनी लिहिले, “धर्मेंद्रजींच्या जाण्याने भारतीय सिनेमातील एक युगच संपले आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळी ऊर्जा, खोली आणि आकर्षण होते. त्यांचा साधेपणा आणि नम्रता हेच त्यांची खरी ओळख होती. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि चाहत्यांसोबत आहे. ओम शांती.”

सहा दशकांचा तेजस्वी प्रवास संपला – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले, “धर्मेंद्रजींचे निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. एका साध्या कुटुंबातून आलेल्या या कलाकाराने सहा दशके प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. प्रत्येक पात्राला त्यांनी जिवंत केले आणि सर्व वयोगटांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.” धर्मेंद्र यांचा निधनाने फक्त एक दिग्गज कलाकारच नाही, तर पिढ्यानुपिढ्यांना प्रेरणा देणारी एक महान व्यक्ती सर्वांपासून दूर गेली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!