Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dilip Walse Patil : माझं राज्यातलं वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटलांनी बोलून दाखवली खदखद, मंत्रीपदाची मागणी का?

Dilip Walse Patil : माझं राज्यातलं वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटलांनी बोलून दाखवली खदखद, मंत्रीपदाची मागणी का?

पुणे (शिरूर) : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वजनदार नेते आणि आठ वेळा आंबेगावमधून विजयी असलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ १५०० मतांच्या काठावर विजय मिळवावा लागला. या निसटत्या निकालाने त्यांना आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना वळसे पाटील यांनी स्वतःबद्दल “राज्यातलं माझं वजन कमी झालं” अशी खदखद व्यक्त केली. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

वळसे पाटील हे शरद पवारांचे दीर्घकाळ जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. २०२३ मध्ये अजित पवारांच्या बंडखोरीत ते त्यांच्याबरोबर गेले आणि महायुती सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आंबेगावमधील त्यांचा मतांचा फरक केवळ १५०० वर थांबला, ज्यामुळे त्यांना मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले.

निवडणूक निकालानंतरच त्यांनी समर्थकांसमोर “मी कोणत्या तोंडाने मंत्रीपद मागू?” असे जाहीरपणे म्हटले होते. आता महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने (नोव्हेंबर २०२५) हे वक्तव्य करून वळसे पाटील यांनी आपल्या असंतोषाची पेटी पुन्हा उघडली आहे.

“एक रुपयाचंही काम केलं नाही”, अमोल कोल्हेंवर अप्रत्यक्ष निशाणा

या कार्यक्रमात वळसे पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोफ डागली. “अमोल कोल्हेंना निवडून दिलं, पण त्यांनी एक रुपयाचंही काम केलं नाही,” अशा शब्दांत त्यांनी कोल्हेंवर हल्ला चढवला.

हे वक्तव्य करताना वळसे पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारींना आधार दिला आणि स्वतःच्या विकासकामांचा उल्लेख करून मतदारांना “आरसा” दाखवला. कोल्हे हे शरद पवारांचे जवळचे मानले जातात आणि आंबेगाव हे वळसे पाटील यांचे पारंपरिक बालेकिल्ले असल्याने हा राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!