Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Unopposed Winners: मतदानापूर्वीच महायुतीचा ‘विजयाचा गुलाल’; KDMC सह राज्यात 15 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड

Unopposed Winners: मतदानापूर्वीच महायुतीचा ‘विजयाचा गुलाल’; KDMC सह राज्यात 15 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड

KDMC Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा अधिकृत टप्पा गाठण्यापूर्वीच महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. कल्याण-डोंबिवली (KDMC) महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीचे तब्बल 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यामुळे महायुतीच्या गोटात प्रचंड जल्लोष पाहायला मिळत आहे. केवळ कल्याणमध्येच नव्हे, तर राज्यभरात महायुतीने 15 जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

केडीएमसीमध्ये युतीची सरशी

कल्याण-डोंबिवलीच्या 122 जागांपैकी 9 जागा आधीच खिशात टाकल्याने महायुतीने सत्तेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. आता बहुमतासाठी (62 जागा) त्यांना केवळ 53 जागांची आवश्यकता आहे. भाजपच्या ५ उमेदवारांचा विजय झाला. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, मंदा पाटील आणि ज्योती पवन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची रणनीती येथे यशस्वी ठरली. तथापी, शिंदे सेनेचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि हर्षल राजेश मोरे (आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव) यांनी बाजी मारली आहे.

हेही वाचा – Kalyan Dombivli Election : मतदानाआधीच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पहिला विजय; कोण आहे तो नगरसेवक?

भिवंडीत २४ वर्षांनंतर इतिहास

दरम्यान, भिवंडी महापालिकेत भाजपने विजयाचे खाते उघडले असून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. गेल्या २४ वर्षांतील भिवंडीच्या निवडणूक इतिहासात बिनविरोध निवडून येणारे सुमित पाटील हे पहिले उमेदवार ठरले आहेत. या ऐतिहासिक यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांचे अभिनंदन केले.

रणनीतीचा विजय

राज्यात भाजपचे 9, शिवसेनेचे 5 आणि राष्ट्रवादीचा 1 असे एकूण 15 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीने विरोधकांवर मोठी आघाडी घेतली आहे. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीचा मार्ग सुकर झाला असून, हा विजय आगामी मुख्य मतदानासाठी ‘बूस्टर डोस’ मानला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!