Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मनसेला 24 तासांत दुसरे मोठे भगदाड! ‘या’ बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

मनसेला 24 तासांत दुसरे मोठे भगदाड! ‘या’ बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

Virendra Tandel: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. संतोष धुरी यांच्या राजीनाम्याचा धक्का ताजा असतानाच, माहीममधील मनसेचे वजनदार नेते आणि माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी थेट राज ठाकरे यांना भावनिक पण परखड पत्र लिहून आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे.

तांडेल यांनी पत्रात काय म्हटले?
विरेंद्र तांडेल यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षाच्या स्थानिक कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, माहीम विभागातील संघटनात्मक कामात मला ज्या प्रकारची वागणूक दिली जात आहे, ती अत्यंत वेदनादायी आणि अपमानास्पद आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि आपुलकी राहिलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. राज साहेब कार्यकर्त्यांना मान देतात, पण दुर्दैवाने ती विचारधारा स्थानिक व्यवस्थापनात (Local Management) दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? अजित पवारांच्या सूचक वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

राज ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात खिंडार
माहीम हा मनसेचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. याच भागातून मनसेचे एकमेव आमदार निवडून आले होते. अशा महत्त्वाच्या विभागात तांडेल यांच्यासारख्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्याने पक्ष सोडल्यामुळे मनसेच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक १९० मध्ये तांडेल यांचा मोठा जनसंपर्क असून, त्यांच्या राजीनाम्याचा फटका आगामी निवडणुकीत मनसेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षातील गळती मनसेसाठी चिंतेची बाब
महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना एकापाठोपाठ एक माजी नगरसेवक पक्ष सोडून जात असल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करूनही स्थानिक नेत्यांच्या ‘कुरघोडी’मुळे तांडेल यांनी घेतलेला हा निर्णय मनसेसाठी मोठा आत्मचिंतनाचा विषय ठरत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!