Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Death: ‘दादांसारखा स्पष्टवक्ता अन् निर्भय नेता शोधून सापडणार नाही…’; अजित पवारांच्या निधनावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

Ajit Pawar Death: ‘दादांसारखा स्पष्टवक्ता अन् निर्भय नेता शोधून सापडणार नाही…’; अजित पवारांच्या निधनावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

Eknath Shinde on Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा आज विमान अपघातात अंत झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्याला अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या प्रशासनावरची एक मजबूत पकड निसटली आहे,” अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

‘निर्णयक्षम आणि निर्भय नेतृत्व’
अजित पवारांच्या कार्यशैलीचे स्मरण करताना शिंदे म्हणाले की, दादांसारखा स्पष्टवक्ता आणि निर्भय नेता शोधून सापडणार नाही. मंत्रिमंडळातील कामाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, “कोणत्याही फाईलचा सखोल अभ्यास केल्याशिवाय ते निर्णय घेत नसत. त्यांची कार्यक्षमता आणि प्रशासकीय कौशल्य हे नवीन राजकारण्यांसाठी नेहमीच आदर्श राहिले आहे. कठीण प्रसंगात डगमगून न जाता ठामपणे उभे राहण्याची त्यांची वृत्ती आम्हाला नेहमीच बळ द्यायची.”

प्रशासकीय सुधारणांचा ‘पॉवर’फुल चेहरा
एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवारांनी दुष्काळमुक्ती आणि जलव्यवस्थापन मोठे काम केले. निर्णयप्रक्रियेत विलंब त्यांना कधीच मान्य नसे. स्पष्टता आणि वेग हीच त्यांची ओळख होती. शेतकरी प्रश्न असोत की सहकार क्षेत्र, प्रत्येक विषयावर त्यांची पकड थक्क करणारी होती.

विरोधकही झाले नतमस्तक

अजित पवारांच्या कार्यपद्धतीची दखल केवळ मित्रपक्षांनीच नव्हे, तर विरोधकांनीही घेतली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने राजकीय वर्तुळात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विमान अपघातात दादांसोबत प्राण गमावलेल्या इतर सदस्यांप्रतीही शिंदे यांनी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!