Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

चड्डी-बनियानवर येत घरावर टाकला दरोडा, शेतकऱ्याच्या तरुण मुलाचा मृत्यू; पुण्यातील यवतमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?

चड्डी-बनियानवर येत घरावर टाकला दरोडा, शेतकऱ्याच्या तरुण मुलाचा मृत्यू; पुण्यातील यवतमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?

यवत (पुणे): दौंड तालुक्यातील यवत रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ शेतात जाणाऱ्या रस्त्यावर शशिकांत चव्हाण यांच्या घरावर तीन अज्ञात चड्डी- बनियन घातलेल्या व्यक्तींनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दगड, काठ्यांनी कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चव्हाण यांचा तरुण मुलगा अविनाश शशिकांत चव्हाण ( वय ३४) यांचा मृत्यू , तर तीनजण जखमी झाले आहेत. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करणे सुरु आहे. घटनास्थळी यवत पोलिसांचे पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील यवतमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शशिकांत चव्हाण यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घरावरती मध्यरात्री दरोडा पडला आहे. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर चव्हाण दाम्पत्यासह घरातील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान मध्यरात्री तीन जणांनी शशिकांत चव्हाण यांच्या घरामध्ये शिरकाव करत त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. हे तीन इसम बनियान आणि चड्डी घालून घरात घुसले होते. हे तीन इसम चोरीच्या उद्देशाने आले होते का? या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र, हा हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत. जखमी झालेल्या तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पोलीस सर्व शक्यतांचा आधार घेऊन तपास करीत आहेत. हल्ला केलेल्या तिघांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तसेच गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया यवत पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. तसेच जखमींवर लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!