Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati By-Election 2026: शरद पवारांचा शब्द अन् खरगेंचं आश्वासन…काँग्रेस उमेदवार दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज मागे घेणार?

Baramati By-Election 2026: शरद पवारांचा शब्द अन् खरगेंचं आश्वासन…काँग्रेस उमेदवार दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज मागे घेणार?

Baramati By-Election 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका फोन कॉलने मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, काँग्रेस आपला उमेदवार रणांगणातून मागे घेण्याच्या तयारीत आहे.

पवारांच्या एन्ट्रीने बदललं समीकरण
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांनी थेट दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संवाद साधला. या चर्चेनंतर काँग्रेसने मवाळ भूमिका घेत माघार घेण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता केवळ हायकमांडच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करत असून, दुपारी २ वाजेपर्यंत आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते.

काँग्रेस नेत्यांचे ‘सकारात्मक’ संकेत
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले, “दिवंगत अजित पवार यांच्याबद्दल जनतेच्या मनात असलेल्या आदरापोटी ही निवडणूक लढवू नये, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ भावना होती. प्रदेश पातळीवर नेत्यांचे एकमत झाले असून, आम्ही तसा प्रस्ताव हायकमांडला दिला आहे. दिल्लीचा आदेश येताच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.”

‘बिनविरोध’साठी सर्वपक्षीय प्रयत्न
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केवळ महायुतीच नाही, तर शरद पवार गटानेही पुढाकार घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करून राजकीय सौजन्य राखण्याची विनंती केली होती. या सामूहिक प्रयत्नांना यश मिळताना दिसत असून, बारामतीची निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

राजकीय सौजन्याचा नवा पायंडा?
राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका नेत्याच्या निधनानंतरची जागा बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची जुनी परंपरा पुन्हा एकदा जपली जाण्याची चिन्हे आहेत. जरी भाजपने काही पूर्वीच्या निवडणुकांमध्ये ही परंपरा मोडल्याची टीका काँग्रेसने केली असली, तरी अजित पवारांच्या निधनाची भावनिक किनार लक्षात घेता काँग्रेसने ‘मोठेपण’ दाखवण्याचे ठरवले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!