Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Traffic Update: पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर धूळ खात पडलेल्या वाहनांची आता खैर नाही; 24 तासांत न हटवल्यास पोलीस करणार जप्त

Pune Traffic Update: पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर धूळ खात पडलेल्या वाहनांची आता खैर नाही; 24 तासांत न हटवल्यास पोलीस करणार जप्त

Pune Traffic Update: पुणे शहरातील रस्त्यांवर वर्षानुवर्षे धूळ खात आणि बेवारस अवस्थेत उभी असलेली वाहने आता कायमची गायब होणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांविरुद्ध बुधवार, 15 एप्रिल 2026 पासून विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी ही वाहने जप्त करण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यामुळे रस्ते मोकळे होण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर आता पोलिसांनी थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये येऊन काम सुरू केले आहे.

24 तासांचा ‘अल्टिमेटम’ अन् जप्तीची टांगती तलवार
वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या नवीन कडक नियमांनुसार, रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या वाहनांवर पोलीस आता जागीच नोटीस चिकटवणार आहेत. नोटीस लावल्यानंतर केवळ 24 तासांची मुदत वाहन मालकाला दिली जाईल. या मुदतीत मालकाने स्वतःहून वाहन न हटवल्यास ते ‘बेवारस’ म्हणून घोषित केले जाईल. त्यानंतर पुढील 48 तासांच्या आत टोईंग व्हॅनद्वारे हे वाहन उचलून जप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या वेगवान कारवाईमुळे बेजबाबदार वाहन मालकांचे धाबे दणाणले आहेत.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी संयुक्त मोहीम आणि मोठा दंड
शहरातील प्रमुख रस्ते आणि अरुंद गल्ल्यांमध्ये पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी पुणे महापालिका आणि वाहतूक पोलीस आता संयुक्तपणे ही मोहीम राबवत आहेत. जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी शहरात स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली असून ती महापालिकेच्या ताब्यात दिली जाणार आहेत. जर मालकाला आपले जप्त केलेले वाहन परत हवे असेल, तर त्याला महापालिकेकडे मोठा आर्थिक दंड भरावा लागेल. दंड भरल्याशिवाय वाहन मालकास दिले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जर तुमच्या परिसरात किंवा रस्त्यावर एखादे वाहन दीर्घकाळ बेवारस अवस्थेत पडले असेल, तर त्याची माहिती तुम्ही ‘PTP’ (Pune Traffic App) च्या माध्यमातून पोलिसांना देऊ शकता. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचतील आणि नोटीस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. वाहतूक कोंडीमुक्त पुण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!