Today मंगळवार, 28th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sonam Raghuvanshi Bail: मोठी बातमी! हनिमूनला गेल्यानंतर पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन मंजूर

Sonam Raghuvanshi Bail: मोठी बातमी! हनिमूनला गेल्यानंतर पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन मंजूर

Sonam Raghuvanshi Bail: इंदूरमधील ‘राजा रघुवंशी हत्या’ प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला शिलाँग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.राजा आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह ११ मे २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. संसाराची नवी स्वप्ने घेऊन हे नवदाम्पत्य २० मे रोजी हनिमूनसाठी मेघालयच्या निसर्गरम्य वातावरणात पोहोचले. मात्र, हा आनंद केवळ औटघटकेचा ठरला. २३ मे रोजी चेरापुंजी येथील होमस्टेमधून बाहेर पडलेले हे जोडपे अचानक बेपत्ता झाले आणि संपूर्ण प्रकरणात एक भयानक वळण आले. पुढे २ जून रोजी ‘वेई सावडाँग’ येथील एका दुर्गम दरीत राजाचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

प्रियकरासोबत संगनमत करून रचला कट
तपास यंत्रणांनी केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सोनमचे लग्नापूर्वीपासूनच तिच्या वडिलांकडे काम करणाऱ्या राज कुशवाह या तरुणाशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही हे संबंध सुरूच असल्याने तिने पती राजाला कायमचे वाटेतून दूर करण्याचा कट रचला. राज कुशवाह आणि त्याच्या साथीदारांनी मेघालयमध्ये राजाचा पाठलाग केला आणि एका निर्जन ठिकाणी त्याला टेकडीवरून खोल दरीत ढकलून दिले. या क्रूर कृत्यात राज कुशवाहसह विशाल सिंग चौहान, आकाश सिंग राजपूत आणि आनंद कुर्मी या साथीदारांचाही समावेश होता, ज्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडी आणि फॉरेन्सिक पुरावे
या प्रकरणाचा तपास करत असताना फॉरेन्सिक रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती उघड झाली. राजाच्या अंगावर पाठीमागून वार करण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला दरीत फेकले गेले होते, हे पुराव्यांवरून सिद्ध झाले. दरम्यान, हत्येनंतर सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे शरणागती पत्करली होती, त्यानंतर ९ जून २०२५ रोजी तिला रीतसर अटक करण्यात आली. यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत तिचा जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र आता तिला जामीन मंजूर झाला आहे.

पीडित कुटुंबाचा न्यायासाठी टाहो
राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी सोनमला मिळालेल्या जामिनावर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. “आमच्या मुलाचा क्रूरपणे बळी घेणाऱ्या आरोपीला जामीन मिळणे दुर्दैवी आहे. आम्ही या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागू आणि शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढा देऊ,” अशी संतप्त भावना राजाच्या भावाने व्यक्त केली आहे. या घटनेमुळे इंदूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!