Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

SRH vs LSG: हैदराबाद-लखनौचे फलंदाज आज पाडणार धावांचा पाऊस

SRH vs LSG: हैदराबाद-लखनौचे फलंदाज आज पाडणार धावांचा पाऊस

हैदराबाद: आयपीएलमध्ये आज (दि. २६) सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुध्द लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात होणार आहे. हा सामना ब्लॉकबस्टर होऊ शकतो. कारण दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाजांची फौज आहे, जे हैदराबादच्या पाटा खेळपट्टीवर धावांचा पाऊस पाडू शकतात. त्यामुळे चाहत्यांचे या सामन्यात भरपूर मनोरंजन होऊ शकते. दोन्ही संघांचा प्रत्येकी एक सामना झाला असून हैदराबादने पहिला सामना जिंकला आहे. तर लखनौने पहिला सामना गमावला असून ते पहिल्या विजयाच्या शोधात असतील.

लखनौ सुपर जायंट्सविषयी बोलायचे झाले, तर त्यांचे अनेक वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत. मोहसीन खान तर संघाबाहेरच झाला आहे. अशातच त्यांच्यापुढे एक समस्या वेगवान गोलंदाजाची जरूर असेल. कारण शार्दूल ठाकूरशिवाय दुसरे मोठे नाव या संघाच्या वेगवान गोलंदाजांमध्ये सामील नाही. सनरायझर्स हैदराबादच्या संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, मागील सामन्यात इशान किशनला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. आता हे पाहावे लागेल की, तो या सामन्यात पूर्णपणे तंदुरूस्त झाला आहे की त्याला आणखी थोडा वेळ लागेल.

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवरील खेळपट्टीविषयी बोलायचे म्हणजे, या मैदानावर खूप धावा निघतात. हे मागील सामन्यातही पाहावयास मिळाले आहे. ट्रॅविस हेड व अभिषेक शर्माची जोडी यावेळीही या मैदानावर नवे विक्रम स्थापित करू शकते. तसेही म्हटले जात आहे की, या हंगामांत ३०२ धावा निघू शकतात व कोणास ठाऊक की हा कारनामा सनरायझर्स हैदराबादच करून दाखवेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!