Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

उदयपूर फाईल्स सुनावणी लांबणीवर; सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

उदयपूर फाईल्स सुनावणी लांबणीवर; सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

नवी दिल्ली: ‘उदयपूर फाईल्स कन्हैयालाल टेलर मर्डर’ या चित्रपटाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता २१ जुलैपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. या चित्रपटाचाबत घेण्यात आलेल्या आक्षेपांवर सरकार काय निर्णय घेते त्याची प्रतीक्षा करावी, असे न्यायालयाने निर्मात्याला सांगितले आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. जोयमाला बागची यांच्या पीठापुढे हे प्रकरण आहे. त्यांनी चित्रपट निर्मात्याला सांगितले की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कन्हैयालाल टेलर खून प्रकरणातील आरोपींना त्यांच्या कथित बदनामीबद्दल भरपाई देता येणार नाही, पण निर्मात्याला मात्र पैशाच्या स्वरूपात भरपाई मिळू शकते. जमियत उलेमा ई हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदानी यांनी केलेल्या याचिकेवरून दिल्ली उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनास १० जुलै रोजी स्थगिती दिली आहे. त्याला चित्रपट निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सिनेमॅटोग्राफ कायद्यानुसार, सरकार जोवर या चित्रपटाबाबत निर्णय घेत नाही तोवर ही स्थगिती असले, असे उच्च न्यायालय म्हणाले होते. त्यासाठी सरकारला आठवड्याची मुदत दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!