Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अपात्र मतदार वगळण्यासाठीच मतदार यादी फेरपडताळणी; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात भूमिका

अपात्र मतदार वगळण्यासाठीच मतदार यादी फेरपडताळणी; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात भूमिका

नवी दिल्ली : बिहारमध्ये मतदार यादी फेरपडताळणी करण्याच्या प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी योग्य ठरवले आहे. या फेरपडताळणीमधून अपात्र मतदारांची नावे वगळली जातील व निवडणुकीचे पावित्र्य आणखी वाढणार आहे, अशा शब्दांत आयोगाने मतदार यादी फेरपडताळणीची पाठराखण केली. बिहारमधील नागरिकांना मतदार यादीत स्वतःचे नाव असल्याची खात्री करण्याची फेरपडताळणीत सुवर्ण संधी असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

बिहार राज्यातून मतदार यादी फेरपडताळणी सुरू करून देशभरात हा प्रयोग करण्याचे निर्देश गेल्या २४ जून रोजी देण्यात आले. या निर्देशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करीत आपली भूमिका स्पष्ट केली. आयोगाने म्हटले की, कायदेशीर चिंता असतानाही मतदार यादी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर-२०२५) अर्थात मतदार यादी फेरपडताळणी प्रक्रियेत ओळख दाखवण्याच्या उद्देशाने आधार, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यावर पूर्वीपासूनच विचार केला जात आहे. ‘एसआयआर’ प्रक्रिया मतदार यादीतून अपात्र व्यक्तींना हटवून निवडणुकीचे पावित्र्य वाढणार आहे, असेही आयोगाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार हा ‘लोकप्रतिनिधित्व अधिनियम-१९५०’च्या कलम १६ व १९ सोबतच कलम ३२६ आणि लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ६२ नुसार प्राप्त झाला. ज्यात नागरिकत्व, वय आणि सामान्य निवास संबंधित पात्रता अशा अटी आहेत. त्यामुळे अपात्र व्यक्तींना मतदान करण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणूनच मतदार यादी फेरपडताळणी करणे हे राज्यघटनेतील कलम १९ व २१ चे उल्लंघन करणारे नाही, असे निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्रात ठळकपणे नमूद केले आहे. बिहारमधील नागरिकांना मतदार यादीत स्वतःच्या नावाची खात्री करण्याची सुवर्ण संधी आहे. बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जात आहेत. यावेळी उपलब्ध पुरावे देऊन नागरिक मतदार म्हणून स्वतःचे नाव निश्चित करू शकतात. इतिहासात सर्वच प्रकारच्या मतदार यादी फेरपडताळणीसाठी हीच पद्धत अंगीकारल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!