Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात आंदेकर टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध बांधकामावर चालवला हातोडा

Pune Crime: पुण्यात आंदेकर टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध बांधकामावर चालवला हातोडा

Pune Crime: पुण्यात पाच सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर या तरुणाची पार्किंगमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेत आयुषचा जागीच मृत्यू झाला होता आणि राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील काही जणांना अटक केली आहे.

गेल्या वर्षी पुण्यात वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्येचा आरोप गणेश कोमकर याच्यावर असून तो सध्या तुरुंगात आहे. याच गणेश कोमकरचा मुलगा म्हणजेच आयुष कोमकर. आरोपानुसार, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने आपल्या नातवाच्या लेकीच्या मुलाची म्हणजेच आयुषची हत्या घडवून आणली. सध्या बंडू आंदेकर पोलिस कोठडीत आहे.

हेही वाचा –

नानापेठेत अवैध बांधकामांवर कारवाई

या प्रकरणानंतर आता पोलिसांनी आंदेकर टोळीवर मोठी कारवाई केली आहे. पुणे महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नाना पेठ परिसरातील आंदेकर टोळीची अवैध बांधकामे पाडायला सुरुवात केली आहे. केवळ बांधकामच नव्हे तर टोळीचे अनधिकृत फ्लेक्सदेखील काढण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या स्मृतिस्थळावर उभारण्यात आलेली पाणपोईदेखील गॅस कटरच्या मदतीने हटवली जात आहे.

27 बँक खाती गोठवली

यापूर्वीच पोलिसांनी बंडू आंदेकर व टोळीच्या तब्बल 27 बँक खाती गोठवली होती. संपत्तीचा मागोवा घेताना ही माहिती समोर आली होती. त्यानंतर आता अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. पुणे पोलिस व महापालिकेच्या संयुक्त कारवाईमुळे आंदेकर टोळीच्या अवैध साम्राज्यावर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!