Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘जयंत पाटील गप्प बसले पण मी…’; जितेंद्र आव्हाड यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा

‘जयंत पाटील गप्प बसले पण मी…’; जितेंद्र आव्हाड यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा

सांगली: सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित संस्कृती बचाव मोर्चा दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना जोरदार टोला लगावला. यापूर्वी पडळकर यांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत अपशब्द वापरल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली होती.

मोर्चात बोलताना आव्हाड यांनी स्पष्ट केले की, ‘विधिमंडळात पडळकर यांनी माझ्याबाबत ‘हा बघा आला लांड्याचा’ असे म्हटले. त्यानंतर मी जे बोलायला हवे होते ते बोललो. त्यावेळी त्यांनी माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला ती गाडी लागली. जयंत पाटील गप्प बसले असतील पण मी गप्प बसणार नाही,’ असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी गोपीचंद पडळकर यांना दिला.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांना सल्ला दिला. त्यांनी म्हटलं की, ‘असेच बोलत राहा, आपल्या ओरिजनल संस्कृतीची महाराष्ट्राला ओळख करून द्या, आपण कसे आहोत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आपण ओरिजनल कसे आहोत हे सर्वांना समजू द्या. तथापी, मोर्चा दरम्यान आव्हाड यांनी स्पष्ट संदेश दिला की, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील संस्कृती आणि मूल्यांची रक्षा करण्यासाठी ठामपणे उभी राहील आणि कोणत्याही प्रकारच्या अपशब्द किंवा आक्रमकतेला चांगला प्रतिसाद देईल.

याशिवाय, मोर्चात आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका करत सांगितले की, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजाने गोळीच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले, हे खेळाडूंच्या कृतीमुळे दहशतवाद्याकडून मारले गेलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!