Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Agni Prime Missile: आता चालत्या ट्रेनमधूनही करता येणार शत्रूंवर हल्ला; रेल्वेवरून अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Agni Prime Missile: आता चालत्या ट्रेनमधूनही करता येणार शत्रूंवर हल्ला; रेल्वेवरून अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Agni Prime Missile: संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच देशाने रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टमवरून अग्नि-प्राइम या मध्यम-श्रेणीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी पूर्ण केली. 2000 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्रामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, हे क्षेपणास्त्र प्रगत तंत्रज्ञानासह तयार करण्यात आले असून, कोणत्याही पूर्वअटीशिवाय देशभरातील रेल्वे नेटवर्कवरून गतिशीलपणे हलवता येते. यामुळे शत्रूपुढे अचानक आणि तात्काळ प्रत्युत्तर देणे शक्य होणार आहे.

विशेष डिझाइन केलेल्या रेल्वे-आधारित लाँचरवरून झालेल्या या पहिल्याच चाचणीत, कमी वेळेत आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. या यशामुळे भारत मोबाईल रेल्वे नेटवर्कवरून कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम विकसित करणाऱ्या निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे. संरक्षण क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाला नवी दिशा मिळाली असून, भविष्यातील सुरक्षेच्या दृष्टीने ही झेप निर्णायक मानली जात आहे

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!