Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तारीख पे तारीख ‘मुळे अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडणार? वेळापत्रकात पुन्हा बदल : अर्जनोंदणी येत्या सोमवारपासून

तारीख पे तारीख ‘मुळे अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडणार? वेळापत्रकात पुन्हा बदल : अर्जनोंदणी येत्या सोमवारपासून

पुणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करावा लागत आहेत. अकरावी प्रवेशासाठीच्या अधिकृत संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने आता अर्जनोंदणीला २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात होत आहे. दरम्यान, सततच्या ‘तारीख पे तारीख मुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राज्यातील सर्व पात्र कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. मात्र, राज्यभरातील लाखो विद्यार्थी एकच वेळी ऑनलाईन अर्ज भरणार असल्याने त्यासाठी भक्कम तयारी करणे आवश्यक आहे. प्रवेशप्रक्रिया कशी राबवली जाईल, याबाबत शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध केला होता.

यापूर्वी १९ मेपासून सुरू होणारी अर्जनोंदणी २१ मेपासून सुरू झाली. परंतु, पहिल्याच दिवशी संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने अर्जनोंदणीची प्रक्रिया ठप्प झाली. संकेतस्थळातील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आता अर्जनोंदणीला २६ मेपासून सुरुवात होत आहे. सकाळी ११ वाजता प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, असे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!