Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बार्शी येथील सर्जेराव मुंढे खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप

बार्शी येथील सर्जेराव मुंढे खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप

बार्शी : बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे शेतीच्या वादातून २०२० साली झालेल्या निर्दयी खुनाच्या प्रकरणात आरोपी महादेव बाजीराव मुंढे (रा. उक्कडगाव, ता. बार्शी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमआदित्य मांडे यांनी भा. दं.वि. कलम ३०२ नुसार दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व ३ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

ही घटना २७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६.४५ ते ७.१५ च्या दरम्यान उक्कडगाव येथे घडली. फिर्यादी मृताची पत्नी असून, मृत सर्जेराव सोमनाथ मुंढे (वय ६१) हे आरोपी महादेव बाजीराव मुंढे यांचे चुलत भाऊ होते. त्यांच्यामध्ये वडिलोपार्जित ६ एकर शेती व त्या शेतातील विहिरीचे व बोअरचे पाणी यावरून वाद होता. या वादावरून बार्शी दिवाणी न्यायालयात दावा सुरू होता.

या वादातून आरोपी महादेव मुंढे याने ‘जमीन न देता जिवे मारतो’ अशी धमकी दिली होती. २७ जानेवारी २०२० रोजी बाबुराव सांगळे यांच्या घरासमोरील रस्त्यावर विजेच्या खांबाजवळ मृत सर्जेराव मुंढे यांच्यावर आरोपी महादेव बाजीराव मुंढे, गणेश महादेव मुंढे व बाजीराव कृष्णा मुंढे यांनी मिळून त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून ठार मारले. या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५/२०२० कलम ३०२ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिवाजी शिरसाट यांनी केला. तपासात प्रत्यक्षदर्शी व अप्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपींनीच हा खून केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीत एकूण १७ साक्षीदा तपासण्यात आले. त्यात तात्याराव मुंढे, सुनील सानप (आयडिया कंपनी नोडल अधिकारी), पोलीस कॉन्स्टेबल मनोज जाधव यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील दिनेश देशमुख व प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले. त्यांनी तपासातील पुरावे आणि साक्ष न्यायालयात प्रभावीपणे मांडले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून प्रभाकर गायकवाड व पोलीस हवालदार कुणाल पाटील यांनी जबाबदारीचे काम पार पाडले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!