Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी; टॉप 10 पैकी 8 कंपन्यांना झाला नफा, जाणून घ्या नेमकं झालं काय?

शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी; टॉप 10 पैकी 8 कंपन्यांना झाला नफा, जाणून घ्या नेमकं झालं काय?

मुंबई : शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात गेल्या पाच दिवसांत दोन्ही शेअर बाजार निर्देशांकांमध्ये जोरदार वाढ झाली. आठवड्यात बीएसई सेन्सेक्स १.६२% वाढला, तर राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) मध्येही १.६४% वाढ झाली. देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २.०५ लाख कोटींनी वाढले. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नफा झाला.

गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना पैशांचा वर्षाव करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेल अव्वल स्थानावर आहे. भारती एअरटेलचे बाजार भांडवल ११.९६ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले आणि त्यांच्या गुंतवणूकदारांनी पाच दिवसांत तब्बल ५५६५२ कोटी कमावले. मुकेश अंबानी रिलायन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांचे बाजार भांडवल ५४९४१ कोटींनी वाढून २०.५५ लाख कोटींवर पोहोचले आहे. दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणूकदारांनी पाच दिवसांत एकूण ११०५९३ कोटींची गुंतवणूक केली.

दरम्यान, देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २.०५ लाख कोटींनी वाढले. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नफा झाला. आता याची माहिती समोर आली आहे. शेअर मार्केटच्या गेल्या पाच दिवसांत एकूण ११०५९३ कोटींची गुंतवणूक केल्याचे दिसून आले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!