Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

UPI बाबत बदलला नियम; सायबर फ्रॉडपासून आता येईल वाचता, आर्थिक फटका टळणार? सरकारने…

नवी दिल्ली : नवीन महिना अर्थात ऑक्टोबर महिन्यापासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) संबंधी एक नियम बदलत आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून, UPI वरील P2P (व्यक्ती-ते-व्यक्ती) कलेक्ट व्यवहार बंद केले जातील. ही माहिती NPCI ने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

एका परिपत्रकात, व्यवहार मर्यादांबाबत माहिती शेअर करण्यात आली आहे. NPCI ने नवीन नियमांनुसार एक नवीन अपडेट जारी केले आहे. या बदलानंतर, P2P कलेक्ट रिक्वेस्ट यापुढे कोणत्याही UPI अॅप किंवा बँकिंग अॅपवर सुरू, राउट किंवा प्रक्रिया केल्या जाणार नाहीत. NPCI परिपत्रकाअंतर्गत, सर्व बँका, पेमेंट सेवा देतात आणि UPI अॅप्सना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाला त्यांच्या सिस्टिम आणि प्रक्रिया अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. १ ऑक्टोबर २०२५ नंतर हे फीचर पूर्णपणे बंद केले जाईल.

दरम्यान, हे नियम बदलल्यानंतर, कोणताही युजर दुसऱ्या युजरला रिक्वेस्ट मनी/कलेक्ट रिक्वेस्ट पाठवून पैसे मागू शकणार नाही. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे आणि अनेक लोकांची फसवणूक केली आहे.

UPI म्हणजे काय?

UPI हे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचे शॉर्टफॉर्म आहे. ते नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केले आहे आणि ग्राहकांना रिअल-टाइम पेमेंट करण्याची सुविधा मिळते. त्यासाठी युजर्संना फक्त QR कोड, मोबाइल नंबर किंवा UPI आयडी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!