Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संजय कपूरने लगावली होती माधुरीच्या कानशिलात

संजय कपूरने लगावली होती माधुरीच्या कानशिलात

महाराष्ट्र जागरण डेस्क: ‘दिल ‘, ‘बेटा’, ‘मन’ आणि ‘धमाल’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक इंद्र कुमार सध्या त्यांच्या मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल एका मुलाखतीत भाष्य केले आहे. याचदरम्यान, इंद्र कुमार यांनी ‘राजा’ चित्रपटाची एक आठवण शेअर केली. १९९५ मध्ये इंद्र कुमार यांचा ‘राजा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण, प्रदर्शनानंतर हा चित्रपट फ्लॉप होईल का? याची भीती त्यांना सतावत होती. तसेच त्यातील माधुरीच्या कानशिलात लगावल्याच्या सीनचा खुलासा या मुलाखतीमध्ये केला.

इंद्र कुमार म्हणाले, राजा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होऊनही मी पुन्हा त्यातील काही सिन्स री-शूट केले होते. कारण या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर जेव्हा मी त्यातील काही सिन्स पाहिले तर ते मलाच समजत नव्हते. त्यामुळे मला माझीच चूक लक्षात आली आणि मी पुन्हा स्क्रिप्ट लिहिली. त्यामुळे चित्रपट सुपरहिट ठरला. पण राजा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांपूर्वी संजय कपूरचा प्रेम हा सिनेमा रिलीज झाला होता. परंतु हा सिनेमा फ्लॉप झाला. पुढे ते म्हणाले, जेव्हा थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला गेलो तेव्हा संजय कपूरमुळे लोक माझी खिल्ली उडवत होते.

मी पण आशा सोडली होती, तेव्हा माझ्या मनात विचार आला की हा आपला शेवटचा सिनेमा असेल, यानंतर मला थेट हरिद्वारला निघून जावे लागणार आहे. कारण चित्रपट नाही चालला तर आपलं सगळ संपणार आहे. पण खरंच माझे नशीब खूप चांगले होते म्हणून राजा चित्रपट सुपरहिट ठरला. मी जेव्हा नॉव्हेल्टी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहत बसलो होतो, तर तेव्हा लोक संजय कपूरबद्दल बोलत होते. थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. ‘राजा’ चित्रपटातील एक सीनबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, ‘राजा’ मध्ये एक सीन होता. ज्यामध्ये माधुरी संजय कपूरचे चित्रपटातील भाऊ परेश रावल यांच्यावर आरोप करते. त्या सीनमध्ये अभिनेता माधुरीच्या कानशिलात लगावतो आणि आपल्या भावाची बाजू घेतो. या एका सीनवर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. तुम जैसी हजारों लडकियां कुर्बान करता हूं अपने भाई पर… या एका डायलॉगवर प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. ही स्क्रिप्टची ताकद होती, असे त्यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!