सध्या अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात जर तुम्ही नियमित चालणाऱ्यांपैकी एक आहात तर काही ठराविक वेळेत चालणे थांबवणं गरजेचे आहे. अन्यथा फुफ्फुसांना नुकसान होऊ शकते. प्रदूषणाची पातळी कमी होईपर्यंत आणि हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत डॉक्टर सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासह बाहेरील क्रियाकलाप टाळण्याचा सल्ला देतात.
दरवर्षी दिल्ली-एनसीआरमधील हवा अत्यंत विषारी बनते. प्रदूषित हवा आरोग्यासाठी हानिकारक ठरते. विशेषतः वृद्ध आणि मुलांसाठी गंभीर बनते. यामुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे. जास्त वारा नसल्यामुळे, प्रदूषणाचे कण सकाळी जमिनीवर स्थिरावतात. परिणामी, सकाळी फिरायला जाणारे लोक ताजी हवेऐवजी प्रदूषित हवा श्वास घेतात. शिवाय, प्रदूषकांमधून येणारे हानिकारक कण आणि कार्बन फुफ्फुसांमध्ये आणि रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे श्वसनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
रात्री चालणे देखील सुरक्षित नाही कारण संध्याकाळी तापमान कमी होते, ज्यामुळे प्रदूषणाचा थर पुन्हा जमिनीजवळ स्थिर होतो. यामुळे संध्याकाळी धुके निर्माण होते, ज्यामुळे वातावरणात प्रदूषक आणि धूळ जास्त प्रमाणात साठते. परिणामी, रात्री चालण्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ञ सकाळी आणि संध्याकाळी बाहेर जाण्याचा वेळ मर्यादित ठेवण्याची आणि दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्याची सल्ला देतात.


