आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. मात्र, काही आजार हे नकळतपणे बळावतातच. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यात किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. ते रक्त फिल्टर करणे, शरीरातील पाणी संतुलित करणे आणि रक्तदाब नियंत्रित करणे अशी अनेक महत्त्वाची कामे करतात.
आपल्यापैकी अनेकजण नकळत त्यांच्या किडनीवर जास्त ताण टाकतात. काही छोट्या सवयींमुळे किडनीचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. जर त्या वेळीच दुरुस्त केल्या तर किडनीचे आरोग्य राखता येते. त्यात जास्त साखर खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. जास्त साखरेमुळे रक्तातील साखर वाढतेच असं नाही तर किडनीवरही दबाव येतो. विशेषतः जर कोणी इन्सुलिन प्रतिरोधक किंवा प्री-डायबेटिक असेल तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
किडनी रक्तातील अतिरिक्त साखर फिल्टर करण्यात व्यस्त असते. जास्त साखरेचे सेवन केल्याने रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात आणि किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, गोड पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्ससारखे पदार्थ खाणे टाळा.
पुरेसे पाणी प्यावे
पाणी किडनीला शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जर शरीर डिहायड्रेट असेल तर किडनी योग्यरित्या कार्य करू शकत नाही. यामुळे किडनी स्टोन किंवा मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. दिवसभर पुरेसे पाणी पिल्याने मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित होण्यास मदत होते.


