Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! दागिन्यांच्या लालसेपोटी ब्लेडने वार करून 40 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; चार तरुणींना अटक

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! दागिन्यांच्या लालसेपोटी ब्लेडने वार करून 40 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; चार तरुणींना अटक

Ahilyanagar Crime: अहमदनगर जिल्ह्यातील बोल्हेगाव (अहिल्यानगर) परिसरात एका 40 वर्षीय महिलेचा दागिन्यांच्या लालसेतून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात हा खून केवळ अनुभवसंपन्न गुन्हेगारांद्वारे नाही, तर चार युवतींच्या टोळीने करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Baramati Crime: तीन वर्षांनंतर मिळाला न्याय; बारामतीतील सरपंच महिलेच्या पतीच्या हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेप

ब्लेडचा वापर करून महिलेच्या गळ्यावर वार

मृत महिलेचे नाव मनिषा शिंदे असून, शुक्रवारी तिच्या राहत्या घरात घुसून या चार जणींनी दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत ब्लेडचा वापर करून महिलेच्या गळ्यावर वार करून तिला ठार केले गेले. याप्रकरणी पोलिसांनी दिव्या अंकुश देशमुख (२०), अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे.

हेही वाचा –Maval Rape and Murder Case: मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; पोलिसांची शोधमोहीम सुरू

पोलीस तपासात समोर आले की, दिव्या देशमुख हिने मयत महिलेच्या दागिन्यांची माहिती आधीपासून मिळवली होती. त्या माहितीनुसार तिने आपल्या तीन साथीदारांना एकत्र करून चोरीचा डाव आखला. आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी मयत महिलेच्या घरात प्रवेश करून गळ्यातील दागिने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला, पण महिलेने प्रतिकार केल्याने जवळील ब्लेडने गळ्यावर वार केला आणि खून केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!