Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात हुंडाबळीची आणखी एक घटना! सरपंच सासू अन् शिक्षक सासऱ्याच्या जाचाला कंटाळून सुनेची आत्महत्या

Pune Crime: पुण्यात हुंडाबळीची आणखी एक घटना! सरपंच सासू अन् शिक्षक सासऱ्याच्या जाचाला कंटाळून सुनेची आत्महत्या

Pune Crime: पुण्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. माहेरून ५० तोळे सोने आणि ३५ लाख रुपये देऊनही सासरच्यांची पैशांची हाव काही संपली नाही. अखेर, सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून सोरतापवाडी येथील दीप्ती रोहन चौधरी या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात सरपंच सासूसह शिक्षक असलेल्या सासऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे देऊनही छळ थांबेना

मिळालेल्या माहितीनुसार, दीप्तीचे लग्न सात वर्षांपूर्वी सोरतापवाडी येथील रोहन चौधरी याच्याशी झाले होते. लग्नात माहेरच्यांनी ५० तोळे सोने आणि शाही थाटमाट केला होता. संसार सुरळीत चालावा यासाठी माहेरून वेळोवेळी १० लाख रुपये आणि गाडीसाठी २५ लाख रुपये देण्यात आले. मात्र, तरीही सासरच्यांकडून चारचाकी गाडीसाठी सतत पैशांची मागणी केली जात होती.

हेही वाचा – नाशिकमध्ये हुंडाबळीची घटना, सासरच्यांकडून पैशांची मागणी; 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

चारित्र्यावर संशय आणि मानसिक छळ

केवळ पैशांसाठीच नव्हे, तर पती रोहन हा दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे समोर आले आहे. अखेर या जाचाला कंटाळून शनिवारी रात्री दीप्तीने टोकाचे पाऊल उचलले. दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी पती रोहन, सरपंच सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!