Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आशिया कप ट्रॉफी देतो पण….; मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाला घातली ‘ही’ अट

आशिया कप ट्रॉफी देतो पण….; मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाला घातली ‘ही’ अट

Asia Cup 2025 Trophy: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, पण विजेतेपद जिंकूनही भारतीय संघाला ट्रॉफी व पदके मिळाली नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास सहमती दर्शवली, पण त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, नक्वी यांनी सांगितले की, ट्रॉफी आणि पदके केवळ औपचारिक समारंभ आयोजित करून खेळाडूंना वैयक्तिकरित्या सोपवल्यास परत केली जातील. भारत-पाकिस्तानमधील राजकीय संबंध पाहता, अशी शक्यता खूपच कमी आहे. अंतिम सामन्यानंतर नक्वी ट्रॉफी व पदके घेऊन स्टेडियम सोडले होते.

बीसीसीआयचे सचिव देबजीत सैकिया यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, आम्ही ट्रॉफी स्वीकारण्याचा निर्णय एसीसी अध्यक्षांकडून घेतला नाही, पण याचा अर्थ असा नाही की ट्रॉफी त्यांच्याकडे राहावी. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून आम्ही आयसीसीमध्ये याचा निषेध नोंदवणार आहोत.

दरम्यान, आज दुपारी 4 वाजता आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) ही बैठक होणार आहे, जिथे ट्रॉफीभोवतीचा वाद चर्चेचा विषय राहील. 24 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक सभेत बीसीसीआय आपला निषेध नोंदवेल असे अपेक्षित आहे. सध्या आशिया कप ट्रॉफी नक्वी ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या ठिकाणीच ठेवली आहे. नंतर दुबईच्या स्पोर्ट्स सिटीमधील एसीसी कार्यालयातून ती भारतात परत आणली जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!