Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune BJP Meeting: भाजपच्या बैठकीनंतर भिडे गुरुजी अन् फडणवीसांची भेट, बंद दरवाजाआड नेमकं काय ठरलं?

Pune BJP Meeting: भाजपच्या बैठकीनंतर भिडे गुरुजी अन् फडणवीसांची भेट, बंद दरवाजाआड नेमकं काय ठरलं?

Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीदरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थिती लावली. ते या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले होते. पश्चिम महाराष्ट्राची बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भिडे गुरुजी यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, भिडे गुरुजी हे मला त्यांच्या मोहिमेचं निमंत्रण द्यायला आले होते. ही मोहीम डिसेंबरमध्ये आहे.याचंच निमंत्रण त्यांनी दिले. मी त्यांना निवडणुकीचं सगळं नियोजन बघून शक्य असेल तर मी येईन, असं संभाजी भिडे गुरूजींना सांगितल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांना दिली.

सीएम फडणवीस म्हणाले,आजच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यामध्ये आमचे सर्व मंत्री,आमदार, पदाधिकारी आणि सगळे माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,असे सगळे वेगवेगळे लोक एकत्रित होते. एका-एका जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतला आहे,अतिशय सकारात्मक परिस्थिती आम्हाला पाहायला मिळत आहे.उत्साह आहे. युतीच्या संदर्भात देखील आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत,त्या संदर्भातील सर्व अधिकार आम्ही जिल्हा पातळीवर दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

जिथे शक्यता असेल, तिथे प्रत्येक ठिकाणी युतीचा प्रयत्न केला पाहिजे.काही ठिकाणी युती शक्य होणार नाही, तिथे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू,पण जरी स्वतंत्र लढलो, तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशाप्रकारचे निर्देश आम्ही त्या ठिकाणी दिले आहेत त्यामुळे त्या – त्या ठिकाणीची परिस्थिती पाहून त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील असंही फडणवीस म्हणाले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!