Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘मुंबई मराठीच नव्हे तर सर्वांची आहे…’; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंचा पलटवार

‘मुंबई मराठीच नव्हे तर सर्वांची आहे…’; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंचा पलटवार

मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख शहरं अदानी आणि अंबानींसाठी आंदण देण्याच्या धोरणावर टीका करताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरवला जात आहे. त्यावेळी भाजपला मतदान करणारा मराठी माणूसही त्यात भरडला जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. महाराष्ट्रात आणि मुंबईत जर मराठी माणसाच्या थडग्यावर उभं राहून विकास होणार असेल, तर मी ते कधीच खपवून घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या या विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

राज ठाकरेंचा दृष्टिकोन संकुचित आणि मुंबईच्या आत्म्याला दुखावणारा असल्याचं रामदास आठवले म्हणाले. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही, तर ती गुजराती आणि मराठी संस्कृतींच्या संगमातून घडलेली आहे. या शहराच्या बांधणीत दोन्ही समाजांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मुंबईला केवळ मराठी ओळखीपुरती मर्यादित करणं चुकीचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

आठवले पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी लढा दिला, पण त्यांनी कधीच मुंबईकडे संकुचित दृष्टीने पाहिलं नाही. राज ठाकरे भाषणं उत्तम करतात, व्यंग्यात्मक बोलतात, पण त्यांच्या वक्तव्यांतून ठोस बदल झालेला दिसत नाही. महाराष्ट्राला केवळ भाषणांनी नव्हे, तर शिक्षण, रोजगार आणि बहुजन विकासाच्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.

हेही वाचा –वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल

निवडणूक प्रक्रियेवरही राज ठाकरेंचा हल्लाबोल

दरम्यान, राज ठाकरे यांनी गोरेगावमध्ये झालेल्या मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळाव्यात निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. मतदान करा किंवा करू नका, मॅच फिक्सिंग आधीच झालंय. मतदार यादीत खोटे नावे भरली आहेत. ही निवडणूक मतदारांचा अपमान आहे, अशी टीका केली. त्यांनी पुढे सांगितले की, जोपर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. सत्तेवर कोण येतं याचं महत्त्व नाही, पण मतदान खऱ्या मतदारांकडूनच झालं पाहिजे, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!