Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘शनिवार वाडा हा कोणाच्या व्यक्तिगत मालकीचा नाही…’; नीलम गोऱ्हे यांचा मेधा कुलकर्णींवर निशाणा

‘शनिवार वाडा हा कोणाच्या व्यक्तिगत मालकीचा नाही…’; नीलम गोऱ्हे यांचा मेधा कुलकर्णींवर निशाणा

पुणे: शनिवार वाड्यातील वादग्रस्त घटनेनंतर राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये नियम मोडल्याचा आरोप होत असतानाच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील वास्तू आहे. तिथे काही नियम आहेत आणि त्याचं पालन झालं पाहिजे. जर नियम मोडले गेले असतील, तर त्यासाठी राज्य सरकार, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. कोणीही स्वतःला सरकार समजून वागू नये, असा कडक इशारा गोऱ्हे यांनी दिला.

शनिवार वाड्यातील वादाची पार्श्वभूमी

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शनिवार वाड्याच्या परिसरात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेने शनिवारी आंदोलन छेडले. त्यांनी नमाज पठण झालेल्या ठिकाणी जाऊन ‘शिववंदना’ करण्याचा आणि त्या भागात गोमूत्र शिंपडण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारताच कुलकर्णी संतापल्या आणि पोलिसांशी तीव्र वाद झाला.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, अशा संवेदनशील ठिकाणी संयम राखला पाहिजे. जर महिलांनी नमाज पठण केले असेल, तर त्यांच्याकडूनही नियमांचे पालन अपेक्षित आहे. उद्या कोणी म्हणेल की मशिदीत जाऊन कीर्तन करायचं, पण म्हणून ते परवानगीशिवाय करता येईल का? इतिहास आणि वारसा जपण्यासाठी पुरातत्व विभागाचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. याच वेळी गोऱ्हे यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य केलं. युतीत असलो म्हणून मुद्दे मांडू नयेत असं नाही. लोकशाहीत प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आमच्या मंत्र्यांबद्दलही प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे कोणी काही बोललं की ते लगेच ‘विरोधात बोलतंय’ असं म्हणणं चुकीचं आहे, असं त्या म्हणाल्या.

भाजप नेते मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर यांचा उल्लेख करत गोऱ्हे पुढे म्हणाल्या, धंगेकर हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे म्हणूनच ते बोलतात. हेतूपुरस्सर आरोप करण्यापेक्षा वास्तवावर आधारित चर्चा व्हायला हवी. जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे हेच सर्वांचे कर्तव्य आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!