Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वाघोलीत आता नव्या बांधकामाना लवकरच बंदी; पुणे महापालिकेचा शासनाला प्रस्ताव

वाघोलीत आता नव्या बांधकामाना लवकरच बंदी; पुणे महापालिकेचा शासनाला प्रस्ताव

पुणे : वाघोली परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या मूलभूत सुविधांच्या गंभीर समस्येमुळे या भागात नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असा प्रस्ताव पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक नवलकिशोर राम यांनी दिली आहे.

आयुक्त राम यांनी बुधवारी वाघोली आणि परिसरातील सांडपाणी व्यवस्था व रस्त्यांची पाहणी केली. या वेळी नागरिकांनी आयुक्तांची गाडी अडवून रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाणी निचऱ्याच्या समस्या मांडल्या. या भागातील पाणी आणि सांडपाणी व्यवस्थेच्या मूलभूत अडचणी दूर केल्याशिवाय नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली.

हेही वाचा –Pune Crime : वाघोलीत तडीपार गुंडाना खंडणी विरोधी पथकाकडून अटक; गावठी पिस्टलसह ३ राउंड जप्त

आयुक्तांच्या पाहणीत लोणीकंद रस्ता, वायफ रस्ता, भवडी रस्ता, फुलमाळ रस्ता, नकोरी रस्ता अशा विविध ठिकाणांचा समावेश होता. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त अनिरुद्ध पावलस्कर आणि परिमंडळ अधिकारी माधव जगताप उपस्थित होते. नवलकिशोर राम म्हणाले, ‘या भागातील पाणीपुरवठा आणि सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था अत्यंत निकृष्ट आहे. पीएमआरडीएकडून मोठ्या प्रमाणावर बांधकामांना परवानग्या दिल्या गेल्या आहेत. मात्र आवश्यक पायाभूत सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे पुढील काळात नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, असे शासनाला कळविण्यात येईल.

आयुक्तांनी पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कळस, घोले आणि धानोरी या भागातील नागरिकांच्या तक्रारींचाही आढावा घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!