Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आमचा वेळ वाया जातो! TV वरील जाहिरातींमुळे त्रस्त पुणेरी आजींची थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार

आमचा वेळ वाया जातो! TV वरील जाहिरातींमुळे त्रस्त पुणेरी आजींची थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार

पुणे: राजकीय नेत्यांकडे नागरिक आपापल्या तक्रारी, अडचणी घेऊन येतात हे काही नवीन नाही. मात्र कधी कधी या तक्रारींचा विषयच एवढा अनोखा असतो की नेत्यांनाही हसू आवरता येत नाही. अशीच एक मजेशीर घटना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे दौऱ्यात घडली. आज पुण्यातील दौऱ्यात सुळे यांच्या अनेक बैठकांदरम्यान आणि कार्यक्रमांदरम्यान एक ज्येष्ठ नागरिक म्हणजेच एक पुणेरी आजीबाई थेट त्यांच्याजवळ आल्या. धावत येऊन त्यांनी खासदार सुळे यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरला. सुळे यांनीही हसून त्यांना विचारले, काय झालं आजी? त्यावर आजीबाईंनी हळहळ व्यक्त केली की, आम्ही पैसे देऊन केबल कनेक्शन घेतो, पण टीव्हीवर कार्यक्रम दहा मिनिटे दाखवतात आणि वीस मिनिटे जाहिराती दाखवतात. मग आम्ही नेमकं काय पाहायचं? असा प्रश्न त्यांनी खासदार सुळे यांच्यासमोर मांडला.

आजींनी सांगितलं की, याबद्दल तक्रार कुठे करावी हेच कळत नाही. योगायोगाने तुम्ही इथे आलात म्हणून तुमच्याकडे सांगतेय. या जाहिरातींमुळे आमचा वेळ वाया जातो, आणि आता आम्हाला त्यांचा प्रचंड कंटाळा आला आहे. सुप्रिया सुळे या आजीबाईंचं म्हणणं ऐकून क्षणभर हसल्या, पण आजीबाई थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या, पंधरा मिनिटांचा कार्यक्रम असतो. पण त्यात सगळ्या जाहिरातींचं चालू असतात.

हेही वाचा – गौतमी पाटीलला मोठा दिलासा! अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून ‘क्लीन चीट’

दरम्यान, यावर सुळे यांनी विनोदी शैलीत विचारलं, ‘अहो 22 मिनिटांचा एपिसोड असतो ना?’ त्यावर आजीबाईंनी ठाम उत्तर दिलं, ‘नाही ग, थोडंसंच दाखवतात ते! कृपा करून तुम्ही काहीतरी करा.’ सुळे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून होकार देत सांगितले, ‘नक्की काहीतरी पाहते, आजी.’ या संवादादरम्यान आजूबाजूचे लोकसुद्धा हसत होते. त्यामुळे सध्या पुणे दौऱ्यात भेटलेल्या आजीची अनोखी तक्रार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!