Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गडावर खळबळ; देवीच्या गर्भगृहातून 22 किलो चांदी लंपास, माजी विश्वस्त चौकशीच्या फेऱ्यात

Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गडावर खळबळ; देवीच्या गर्भगृहातून 22 किलो चांदी लंपास, माजी विश्वस्त चौकशीच्या फेऱ्यात

Saptashrungi Devi Temple: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी गडावरील मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मंदिराच्या गर्भगृहातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीपैकी तब्बल २२ किलो ६९७ ग्रॅम चांदी गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या कागदपत्रांमध्ये ४०६ किलो चांदीची नोंद असताना, प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी आढळून आली आहे. हा साडेबावीस किलोचा फरक म्हणजे मोठा अपहार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, व्यवस्थापक सुट्टीवर असताना रात्रीच्या वेळी ही चांदी काढण्यात आल्याचे चौकशीत समोर आले असून, या कृतीमुळे संशयाची सुई तत्कालीन विश्वस्तांकडे वळली आहे.

प्रशासनाकडून कडक कारवाईचे संकेत
या गंभीर प्रकरणाची दखल घेत विभागीय आयुक्तांनी चौकशीचे चक्र फिरवले आहे. सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी या प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष आणि विश्वस्तांविरुद्ध भादंवि कलम ४०९, ४२० अन्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना या प्रकरणाचा सखोल तपास करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

रात्रीच्या अंधारात चांदी काढण्याचा प्रताप?
१५ सप्टेंबर २०२१ रोजीच्या ठरावानुसार ही चांदी दिवसा काढणे अपेक्षित होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या वेळी मूल्यमापक नसताना ही चांदी हलवण्यात आल्याचा आरोप आहे. तत्कालीन व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी या विरोधात पत्र व्यवहार केल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची चर्चाही आता गडावर रंगली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या गैरप्रकारानंतर आता सप्तशृंगी गडावरील हा प्रकार समोर आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!