Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! पालघरमध्ये आश्रमशाळेत शाळेत शिकणाऱ्या 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

धक्कादायक! पालघरमध्ये आश्रमशाळेत शाळेत शिकणाऱ्या 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

पालघर: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका येथील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन किशोरवयीन विद्यार्थ्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. मृतांची वय १४ आणि १५ वर्षे असून ते अनुक्रमे नववी आणि दहावीत शिकत होते. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता किंद्रे आणि पोलिस उपअधीक्षक समीर माहेर यांनी सांगितले की, मृत विद्यार्थ्यांनी कपडे सुकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन दोरीचा उपयोग करून आश्रमशाळेच्या परिसरातील झाडाला गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला.

हेही वाचा – Chandrapur: चंद्रपूर हादरले! जमीन फसवणुकीच्या वादातून शेतकऱ्याची तहसील कार्यालयात आत्महत्या; खासदार धानोरकरांवर कुटुंबीयांचा गंभीर आरोप

या शाळेत सध्या परीक्षा सुरू असून दोन्ही विद्यार्थी जिल्ह्यातील मोखाडा तालुका येथील असून शाळेपासून सुमारे ८० किमी अंतरावर राहत होते. पालघर पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही आश्रमशाळा आदिवासी किंवा वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी असून येथे मोफत जेवण, निवास आणि शिक्षण दिले जाते. घटनास्थळी शोककळा पसरली असून शाळा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!