Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PNG Gas Connection: PNG साठी अर्ज न केल्यास घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार खंडित; छगन भुजबळांची मोठी घोषणा

PNG Gas Connection: PNG साठी अर्ज न केल्यास घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार खंडित; छगन भुजबळांची मोठी घोषणा

PNG Gas Connection: सध्या जगभरात कच्च्या तेलाची आणि नैसर्गिक वायूची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या संकटामुळे भारतातही एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमती वाढल्या असून पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यावर पर्याय म्हणून सरकारने आता ‘पाईप गॅस’ (PNG) जोडणीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून, ज्या भागात ही सुविधा उपलब्ध आहे तिथल्या नागरिकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

तीन महिन्यांची मुदत आणि सक्तीचे नियम
मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, ज्या शहरी किंवा ग्रामीण भागात पीएनजीची पाईपलाईन पोहोचली आहे, तिथे राहणाऱ्या नागरिकांनी पुढील तीन महिन्यांच्या आत नवीन जोडणीसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे.

कोणाला लागू आहे नियम?
हा नियम घरगुती वापरासोबतच व्यावसायिक गॅस ग्राहकांसाठीही लागू असेल. जर तुमच्या भागात पीएनजीची सुविधा उपलब्ध असूनही तुम्ही त्यासाठी अर्ज केला नाही, तर तुमचे सध्याचे एलपीजी सिलिंडर कनेक्शन कायमचे बंद केले जाऊ शकते.

अर्ज कसा आणि कुठे करावा?
नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने पीएनजी नोंदणीचे नियम अत्यंत शिथिल केले आहेत.
१. ज्या कंपन्यांना तुमच्या भागाचे काम दिले आहे, त्यांच्याकडे थेट अर्ज करता येईल.
२. जर कंपनीची माहिती नसेल, तर नागरिक आपला पत्ता आणि अर्जासह जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे (District Supply Officer) संपर्क साधू शकतात.

पुरवठा कधी बंद होणार नाही?
भुजबळ यांनी नागरिकांची भीती दूर करताना एक महत्त्वाचा दिलासाही दिला आहे. “जर तुम्ही पीएनजीसाठी रीतसर अर्ज केला असेल, पण तांत्रिक कारणांमुळे कंपनी तुम्हाला कनेक्शन देऊ शकली नसेल, तर अशा परिस्थितीत तुमचा एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाणार नाही.” म्हणजेच, अर्ज करणे हीच तुमची जबाबदारी आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!